शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अमरावती विभागात आठ महिन्यांत १०६९ जणांना फवारणीतून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 14:22 IST

अकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून दर दिवशी चार जणांना विषबाधा झाल्याच्या घटना अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत उघडकीस आल्या आहेत.

- सदानंद सिरसाटअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून दर दिवशी चार जणांना विषबाधा झाल्याच्या घटना अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत उघडकीस आल्या आहेत. विभागात १०६९ विषबाधितांपैकी चौघांचा मृत्यू झाला. त्यातील तिघे अकोला जिल्ह्यातील आहेत. ही बाब कृषी, आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक, जनजागृतीपर उपाययोजनांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.गेल्यावर्षीच्या संपूर्ण खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १०४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यूच्या संख्येमुळे शासनही हादरले. तोच प्रकार यावर्षीही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.ऊस पिकासाठी शिफारस केलेली कीटकनाशके, ज्या भागात ते पीक घेतले जात नाही, तेथेही पुरवठा करण्यात आले. त्या कीटकनाशकांची शिफारस केलेल्या पिकांचा पेरा नसताना इतर पिकांसाठी त्याचा वापर केल्याने शेतकरी आणि मजुरांना विषबाधा झाल्याचे फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीच्या निदर्शनास आले होते. चालू वर्षातही अकोला जिल्ह्यात २९१ शेतकरी, मजुरांना विषबाधा झाली. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अमरावती विभागात १ एप्रिल ते १५ नोव्हेंबर या काळात १०६९ जणांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली. विषबाधेच्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यूही झाला आहे. ६ विषबाधितांवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यापैकी बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधितांची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली. इतर जिल्ह्यातील माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या अहवालानुसार आकडेवारी देण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती