शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अमरावती विभागात आठ महिन्यांत १०६९ जणांना फवारणीतून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 14:22 IST

अकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून दर दिवशी चार जणांना विषबाधा झाल्याच्या घटना अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत उघडकीस आल्या आहेत.

- सदानंद सिरसाटअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून दर दिवशी चार जणांना विषबाधा झाल्याच्या घटना अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत उघडकीस आल्या आहेत. विभागात १०६९ विषबाधितांपैकी चौघांचा मृत्यू झाला. त्यातील तिघे अकोला जिल्ह्यातील आहेत. ही बाब कृषी, आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक, जनजागृतीपर उपाययोजनांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.गेल्यावर्षीच्या संपूर्ण खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १०४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यूच्या संख्येमुळे शासनही हादरले. तोच प्रकार यावर्षीही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.ऊस पिकासाठी शिफारस केलेली कीटकनाशके, ज्या भागात ते पीक घेतले जात नाही, तेथेही पुरवठा करण्यात आले. त्या कीटकनाशकांची शिफारस केलेल्या पिकांचा पेरा नसताना इतर पिकांसाठी त्याचा वापर केल्याने शेतकरी आणि मजुरांना विषबाधा झाल्याचे फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीच्या निदर्शनास आले होते. चालू वर्षातही अकोला जिल्ह्यात २९१ शेतकरी, मजुरांना विषबाधा झाली. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अमरावती विभागात १ एप्रिल ते १५ नोव्हेंबर या काळात १०६९ जणांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली. विषबाधेच्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यूही झाला आहे. ६ विषबाधितांवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यापैकी बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधितांची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली. इतर जिल्ह्यातील माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या अहवालानुसार आकडेवारी देण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती