शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

अमरावती विभागात आठ महिन्यांत १०६९ जणांना फवारणीतून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 14:22 IST

अकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून दर दिवशी चार जणांना विषबाधा झाल्याच्या घटना अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत उघडकीस आल्या आहेत.

- सदानंद सिरसाटअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून दर दिवशी चार जणांना विषबाधा झाल्याच्या घटना अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत उघडकीस आल्या आहेत. विभागात १०६९ विषबाधितांपैकी चौघांचा मृत्यू झाला. त्यातील तिघे अकोला जिल्ह्यातील आहेत. ही बाब कृषी, आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक, जनजागृतीपर उपाययोजनांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.गेल्यावर्षीच्या संपूर्ण खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १०४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यूच्या संख्येमुळे शासनही हादरले. तोच प्रकार यावर्षीही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.ऊस पिकासाठी शिफारस केलेली कीटकनाशके, ज्या भागात ते पीक घेतले जात नाही, तेथेही पुरवठा करण्यात आले. त्या कीटकनाशकांची शिफारस केलेल्या पिकांचा पेरा नसताना इतर पिकांसाठी त्याचा वापर केल्याने शेतकरी आणि मजुरांना विषबाधा झाल्याचे फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीच्या निदर्शनास आले होते. चालू वर्षातही अकोला जिल्ह्यात २९१ शेतकरी, मजुरांना विषबाधा झाली. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला.आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अमरावती विभागात १ एप्रिल ते १५ नोव्हेंबर या काळात १०६९ जणांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली. विषबाधेच्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यूही झाला आहे. ६ विषबाधितांवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यापैकी बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधितांची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली. इतर जिल्ह्यातील माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या अहवालानुसार आकडेवारी देण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती