शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

ग्रीन हायवे पॉलिसीत अमरावती-चिखली नाही! पश्चिम विदर्भातील एनजीओ-नर्सरी संचालकांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:04 IST

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात देशभरात राबविल्या जात असलेल्या ग्रीन हायवे पॉलिसीत अमरावती-चिखली चौपदरीकरण मार्ग नसल्याची माहिती समोर आली आहे.

संजय खांडेकर/ अकोला : केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात देशभरात राबविल्या जात असलेल्या ग्रीन हायवे पॉलिसीत अमरावती-चिखली चौपदरीकरण मार्ग नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रीन हायवे पॉलिसीवर लक्ष ठेवून बसलेल्या पश्चिम विदर्भातील एनजीओ-नर्सरी संचालकांना जबर धक्का बसला आहे. देशभरात चार पदरी, सहा, आठ पदरी मार्ग निर्माणचे कार्य राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. मोठ्या रूंदीच्या या मार्गांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष कटाई केली जाते. ही वृक्ष कटाई होत असतानाच केंद्राने १० कोटी रोपांची लागवड करण्याची घोषणा केली होती.

राष्ट्रीय महामार्गावरील प्रदूषण आणि कार्बनडाय आॅक्साईडचा वायू कमी करण्यासाठी ग्रीन हायवेची विशेष पॉलिसी आखण्यात आली. पूर्वी मार्ग निर्माण करणा-या कंत्राटदाराकडेच रोपे लावण्याची आणि त्याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली जायची. मात्र, कंत्राटदाराचे मार्ग बांधकाम झाले, की ते वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करायचेत. ही बाब अधोरेखित झाल्यानंतर केंद्र सरकार आणि विशेष करून केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी ग्रीन हायवे पॉलिसी अस्तित्वात आणली. ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होईल, त्या ठिकाणी वन विभाग आणि एनजीओ मार्फत महामार्गांच्या दोन्ही बाजूला रोप लागवड केली जाईल.

केवळ लागवडच नव्हे, तर या रोपांच्या संगोपन आणि संवर्धनाची जबाबदारीदेखील या संस्थेकडे दिली गेली आहे. ग्रीन हायवे पॉलिसी आपल्याकडेही अस्तित्वात येईल, या अपेक्षेत पश्चिम विदर्भवासी होते. अमरावती- चिखली चौपदरीकरणाचे (एनएच-६चे ) काम चार टप्प्यात सुरू झाल्याने ग्रीन हायवे प्रकल्प आपल्याकडे राबविला जाईल म्हणून अमरावती- चिखलीपर्यंत अनेक सामाजिक संस्थांनी नर्सरी डेव्हलप करून ठेवली. कारण विदर्भाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तसे आवाहन अनेकदा भाषणातून केले. मात्र, अलीकडेच न्यायालयाने जेव्हा वृक्षकटाई संदर्भात निर्देश दिलेत. त्यातून अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग ग्रीन हायवे पॉलिसीतून वगळला असल्याचे समोर आले आहे. काय आहे ग्रीन हायवे पॉलिसी?ग्रीन हायवे पॉलिसी हा केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.भारतात सध्या पायाभूत सुविधांवर भर दिल्या जात असून, यांतर्गत पक्क्या रस्त्यांची निर्मिती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या रस्त्यांची निर्मिती व रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचा -हास होण्याची शक्यता लक्षात घेता, नितीन गडकरी यांनी २०१५ मध्ये ‘ग्रीन हायवे पॉलिसी’ हे अभियान सुररू केले. देशात सध्या ९६ हजार २६० किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. या अभियानांतर्गत देशभरातील राष्ट्रीय महामार्गांलगत सामाजिक संघटना, शेतकरी, खासगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणेच्या भागीदारीतून महामार्गांलगत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महामार्गांलगत झाडे लावून देशभरात हरितपट्टे तयार करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

वृक्षलागवड केली जाणार अमरावती-चिखली चौपदरीकरणाच्या कंत्राटाची निविदा जेव्हा काढली गेली, तेव्हा ग्रीन हायवे पॉलिसी अस्तित्वातच आली नव्हती. त्यामुळे अमरावती-चिखली या मार्गावर जुन्या पद्धतीनेच कंत्राटदाराकडून वृक्षलागवड केली जाणार आहे. - विलास ब्राह्मणकर कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग (चौपदरीकरण ) विभाग अमरावती.