शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

अकोट तालुक्यातील अंबोडा गावाच्या खडकाळ माळरानावर फुलले नंदनवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:20 IST

अकोला : महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडी गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले.

ठळक मुद्देहरिदास गुलाबराव ताठे २००४-०५ दरम्यान महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण अकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सिंचन तलावाची पाहणी केली.पाइपलाइनद्वारे गॅ्रव्हीटेशनल फोर्सद्वारे २४ तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलेली आहे. आजमितीस येथे ३४ एकरावर सिंचन करण्यात येत असून, शेत तेथे पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत.

- राजरत्न सिरसाट 

अकोला : सातपुड्याच्या पर्वत रांगा, पायथ्याशी खडक, दगड, शेती कसणे, करणे म्हणजे खडकासारखे खडतर... पण, आता येथे काळ््या आईने हिरवा शालू पांघरला... ४२ वर्षांच्या संघर्षानंतर सिंचन तलावातून शेतकºयांना पाणी मिळालं तेही विजेविना... महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडा  गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले.अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अंबोडा  गाव आहे. या भागातील शेतकºयांचे आर्थिक, सामाजिक जीवन उंचावण्यासाठी सन १९७६ मध्ये या गावाच्या वरच्या बाजूला एक धरण बांधण्यात आले आहे. ३१३ एकर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाच्या लाभ क्षेत्रात ६८ शेतकरी येतात. या धरणाचे पाणलोट क्षेत्र उत्तम असून, हे धरणा पहिल्या दोन-तीन पावसात पूर्ण पाण्याने भरू न जातं. शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने पाण्याची बचत करू न जास्तीत जास्त शेतकºयांना विनावीज, तुषार, ठिबक सिंचन पद्धतीने या पाण्याचा लाभ शेतकºयांना घेता यावा, हा उद्देश हे धरण बांधण्यामागे होता. पण, ४२ वर्षांत या धरणातून सिंचन झालं ते नावापुरतच... ते म्हणजे ३२.४१ टक्केच. मागील दोन दशकापासून सिंचनासाठीचा कालवा बुजल्याने शेतकºयांना पाणी मिळत नव्हत.हरिदास गुलाबराव ताठे २००४-०५ दरम्यान महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण अकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सिंचन तलावाची पाहणी केली. या तलावातून उत्तमरीत्या सिंचन होत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांना भेटून, या धरणाची स्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली.शेतकºयांनी पाणी वापर सहकार संस्थेची नोंदणी केली. ताठे यांनी त्यानंतर मागे बघता, या धरणातून शेतकºयांना पाणी देण्याचे नियोजन केले. धरण गावाच्या वरच्या बाजूने असल्याने त्यांनी कालव्याऐवजी पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला. पाइपलाइनद्वारे गॅ्रव्हीटेशनल फोर्सद्वारे २४ तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलेली आहे. त्या जॅकवेलमधून धरणाच्या बाहेर २.५० व्यासाचे तीन पाइप काढण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी तीन वेगळे प्लॉस्टिकचे पाइप जोडण्यात आले. विजेचा वापर न करता येथे २४ तास सिंचन व्यवस्था सुरू झाली आहे. शेत तेथे पाइपलाइन टाकण्यात आली असून, शेतकºयांनी त्यासाठी प्रतिएकर ९ हजार रुपये एकूण ९ लाख रुपये त्यासाठी खर्च केला. आजमितीस येथे ३४ एकरावर सिंचन करण्यात येत असून, शेत तेथे पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत.

धरणातील पाण्याचा हिशेबप्रत्येक शेतासाठी स्वतंत्र पाणी पुवरठा व्यवस्थापन असून, धरणातील पाण्याचा लीटरमध्ये हिशेब ठेवण्यात येतो. सर्व शेतकºयांना एकाचवेळी पाणी उपलब्ध होत असून, शेतकरी आवश्यकतेनुसार केव्हाही पाणी उचलतात. विशेष म्हणजे ओलिताकरिता मजूरही लावण्याची गरज नाही. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणakotअकोटDamधरणagricultureशेती