शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अकोट तालुक्यातील अंबोडा गावाच्या खडकाळ माळरानावर फुलले नंदनवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:20 IST

अकोला : महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडी गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले.

ठळक मुद्देहरिदास गुलाबराव ताठे २००४-०५ दरम्यान महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण अकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सिंचन तलावाची पाहणी केली.पाइपलाइनद्वारे गॅ्रव्हीटेशनल फोर्सद्वारे २४ तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलेली आहे. आजमितीस येथे ३४ एकरावर सिंचन करण्यात येत असून, शेत तेथे पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत.

- राजरत्न सिरसाट 

अकोला : सातपुड्याच्या पर्वत रांगा, पायथ्याशी खडक, दगड, शेती कसणे, करणे म्हणजे खडकासारखे खडतर... पण, आता येथे काळ््या आईने हिरवा शालू पांघरला... ४२ वर्षांच्या संघर्षानंतर सिंचन तलावातून शेतकºयांना पाणी मिळालं तेही विजेविना... महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडा  गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले.अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अंबोडा  गाव आहे. या भागातील शेतकºयांचे आर्थिक, सामाजिक जीवन उंचावण्यासाठी सन १९७६ मध्ये या गावाच्या वरच्या बाजूला एक धरण बांधण्यात आले आहे. ३१३ एकर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाच्या लाभ क्षेत्रात ६८ शेतकरी येतात. या धरणाचे पाणलोट क्षेत्र उत्तम असून, हे धरणा पहिल्या दोन-तीन पावसात पूर्ण पाण्याने भरू न जातं. शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने पाण्याची बचत करू न जास्तीत जास्त शेतकºयांना विनावीज, तुषार, ठिबक सिंचन पद्धतीने या पाण्याचा लाभ शेतकºयांना घेता यावा, हा उद्देश हे धरण बांधण्यामागे होता. पण, ४२ वर्षांत या धरणातून सिंचन झालं ते नावापुरतच... ते म्हणजे ३२.४१ टक्केच. मागील दोन दशकापासून सिंचनासाठीचा कालवा बुजल्याने शेतकºयांना पाणी मिळत नव्हत.हरिदास गुलाबराव ताठे २००४-०५ दरम्यान महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण अकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सिंचन तलावाची पाहणी केली. या तलावातून उत्तमरीत्या सिंचन होत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांना भेटून, या धरणाची स्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली.शेतकºयांनी पाणी वापर सहकार संस्थेची नोंदणी केली. ताठे यांनी त्यानंतर मागे बघता, या धरणातून शेतकºयांना पाणी देण्याचे नियोजन केले. धरण गावाच्या वरच्या बाजूने असल्याने त्यांनी कालव्याऐवजी पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला. पाइपलाइनद्वारे गॅ्रव्हीटेशनल फोर्सद्वारे २४ तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलेली आहे. त्या जॅकवेलमधून धरणाच्या बाहेर २.५० व्यासाचे तीन पाइप काढण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी तीन वेगळे प्लॉस्टिकचे पाइप जोडण्यात आले. विजेचा वापर न करता येथे २४ तास सिंचन व्यवस्था सुरू झाली आहे. शेत तेथे पाइपलाइन टाकण्यात आली असून, शेतकºयांनी त्यासाठी प्रतिएकर ९ हजार रुपये एकूण ९ लाख रुपये त्यासाठी खर्च केला. आजमितीस येथे ३४ एकरावर सिंचन करण्यात येत असून, शेत तेथे पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत.

धरणातील पाण्याचा हिशेबप्रत्येक शेतासाठी स्वतंत्र पाणी पुवरठा व्यवस्थापन असून, धरणातील पाण्याचा लीटरमध्ये हिशेब ठेवण्यात येतो. सर्व शेतकºयांना एकाचवेळी पाणी उपलब्ध होत असून, शेतकरी आवश्यकतेनुसार केव्हाही पाणी उचलतात. विशेष म्हणजे ओलिताकरिता मजूरही लावण्याची गरज नाही. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणakotअकोटDamधरणagricultureशेती