शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

अकोट तालुक्यातील अंबोडा गावाच्या खडकाळ माळरानावर फुलले नंदनवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 13:20 IST

अकोला : महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडी गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले.

ठळक मुद्देहरिदास गुलाबराव ताठे २००४-०५ दरम्यान महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण अकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सिंचन तलावाची पाहणी केली.पाइपलाइनद्वारे गॅ्रव्हीटेशनल फोर्सद्वारे २४ तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलेली आहे. आजमितीस येथे ३४ एकरावर सिंचन करण्यात येत असून, शेत तेथे पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत.

- राजरत्न सिरसाट 

अकोला : सातपुड्याच्या पर्वत रांगा, पायथ्याशी खडक, दगड, शेती कसणे, करणे म्हणजे खडकासारखे खडतर... पण, आता येथे काळ््या आईने हिरवा शालू पांघरला... ४२ वर्षांच्या संघर्षानंतर सिंचन तलावातून शेतकºयांना पाणी मिळालं तेही विजेविना... महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडा  गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले.अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी अंबोडा  गाव आहे. या भागातील शेतकºयांचे आर्थिक, सामाजिक जीवन उंचावण्यासाठी सन १९७६ मध्ये या गावाच्या वरच्या बाजूला एक धरण बांधण्यात आले आहे. ३१३ एकर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाच्या लाभ क्षेत्रात ६८ शेतकरी येतात. या धरणाचे पाणलोट क्षेत्र उत्तम असून, हे धरणा पहिल्या दोन-तीन पावसात पूर्ण पाण्याने भरू न जातं. शाश्वत पाणी उपलब्ध असल्याने पाण्याची बचत करू न जास्तीत जास्त शेतकºयांना विनावीज, तुषार, ठिबक सिंचन पद्धतीने या पाण्याचा लाभ शेतकºयांना घेता यावा, हा उद्देश हे धरण बांधण्यामागे होता. पण, ४२ वर्षांत या धरणातून सिंचन झालं ते नावापुरतच... ते म्हणजे ३२.४१ टक्केच. मागील दोन दशकापासून सिंचनासाठीचा कालवा बुजल्याने शेतकºयांना पाणी मिळत नव्हत.हरिदास गुलाबराव ताठे २००४-०५ दरम्यान महाराष्ट्र  जीवन प्राधिकरण अकोट उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी या सिंचन तलावाची पाहणी केली. या तलावातून उत्तमरीत्या सिंचन होत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांना भेटून, या धरणाची स्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली.शेतकºयांनी पाणी वापर सहकार संस्थेची नोंदणी केली. ताठे यांनी त्यानंतर मागे बघता, या धरणातून शेतकºयांना पाणी देण्याचे नियोजन केले. धरण गावाच्या वरच्या बाजूने असल्याने त्यांनी कालव्याऐवजी पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला. पाइपलाइनद्वारे गॅ्रव्हीटेशनल फोर्सद्वारे २४ तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलेली आहे. त्या जॅकवेलमधून धरणाच्या बाहेर २.५० व्यासाचे तीन पाइप काढण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी तीन वेगळे प्लॉस्टिकचे पाइप जोडण्यात आले. विजेचा वापर न करता येथे २४ तास सिंचन व्यवस्था सुरू झाली आहे. शेत तेथे पाइपलाइन टाकण्यात आली असून, शेतकºयांनी त्यासाठी प्रतिएकर ९ हजार रुपये एकूण ९ लाख रुपये त्यासाठी खर्च केला. आजमितीस येथे ३४ एकरावर सिंचन करण्यात येत असून, शेत तेथे पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत.

धरणातील पाण्याचा हिशेबप्रत्येक शेतासाठी स्वतंत्र पाणी पुवरठा व्यवस्थापन असून, धरणातील पाण्याचा लीटरमध्ये हिशेब ठेवण्यात येतो. सर्व शेतकºयांना एकाचवेळी पाणी उपलब्ध होत असून, शेतकरी आवश्यकतेनुसार केव्हाही पाणी उचलतात. विशेष म्हणजे ओलिताकरिता मजूरही लावण्याची गरज नाही. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणakotअकोटDamधरणagricultureशेती