शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

काँग्रेसने प्रस्ताव नाकारल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढणार - अ‍ॅड. आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 13:04 IST

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू अशी घोषणा भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देमतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस सोबत आघाडीचा पर्याय खुला ठेवला आहे.४८ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून राज्यभर दौरे व मेळावे यांचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले.

अकोला- वंचित समाज सत्तेत जाऊ शकला नाही. त्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. या समाजाचा आतापर्यंत वापर करण्यात आला आता वंचीत समाज जागा झाला आहे. महाराष्ट्रात  आम्ही दोन अधिवेशन घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली असून धर्मनिरपेक्ष विचारांसोबत निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला आम्ही १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद आला नाही भविष्यात तो न आल्यास महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू अशी घोषणा भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.वंचीत बहूजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.वंचित समाजाला गेल्या ६८ वर्षात न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदतो आहे. सत्तेत गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव वंचितांना व्हायला लागली. सर्वच सत्ता पक्षांनी वापर केला असल्याची जाणीव त्यांना झाली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील वंचित बहुजनांची मुठ बांधून सत्ता संपादनाचा निर्धार केला आहे. त्याअनुषंगाने धनगर समाज व भटक्या विमुक्त समाजाचे दोन अधिवेशन झालीत आहेत. या समाजाची विचारधारा ही धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस सोबत आघाडीचा पर्याय खुला ठेवला आहे. माळी, धनगर, मुस्लीम, भटक्या विमुक्त, ओबीसीमधील अती मागास व मागासवर्गीय अशा जातींना प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून १२ जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. या मागणीबाबत अजून काँग्रेसकडून कोणतीही चर्चा नाही. काँग्रेसने प्रस्ताव न स्विकारल्यास ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून राज्यभर दौरे व मेळावे यांचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेस