शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अकोलेकरांना आवडतो चिवचिवाट...दाणापाण्याची केली व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 10:20 IST

८९ टक्के लाेकांनी चिमण्यांसाठी घरासमाेर पाण्याचे भांडे ठेवल्याचे समाेर आले असून ८२ टक्के लाेकांनी दाण्यांची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अकाेला : निसर्गकट्टा, प्राणिशास्त्र विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला व महात्मा फुले महाविद्यालय पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्ह्यासाठी ऑनलाईन चिमणी गणना आयोजित करण्यात आली होती. या गणनेत ६९० लोकांनी सहभाग नोंदविला होता. या गणनेत ७ प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नाच्या अनुषंगाने नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्व्हेमध्ये सहभागी ८९ टक्के लाेकांनी चिमण्यांसाठी घरासमाेर पाण्याचे भांडे ठेवल्याचे समाेर आले असून ८२ टक्के लाेकांनी दाण्यांची व्यवस्था केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्व्हेबाबत अधिक माहिती देताना निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी सांगितले की, अकोल्याला जिल्ह्यातील चिमण्यांची स्थिती काय आहे व त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाय करावे, यासाठी या सर्व्हेचे आयोजन करण्यात आले होते. फक्त चिमण्यांची संख्याची आकडेवारी न काढता चिमणी संवर्धनासाठी किती लोक जागरूक आहे हे पाहणे हा या सर्व्हेचा मुख्य उद्देश होता. पहिल्या वर्षी जरी आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला पण दरवर्षी हा उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांना या चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

या चिमणी गणनेला डॉ. मिलिंद शिरभाते, सहप्राध्यापक, प्राणिशास्त्र विभाग, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय व डॉ. अमृता शिरभाते, प्राणिशास्त्र विभाग, महात्मा फुले महाविद्यालय पातूर यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

 

या सर्व्हेमध्ये ज्या लोकांनी कृत्रिम घरटे लावण्याची इच्छा दर्शविली आहे त्यांना आम्ही घरटे उपलब्ध करून देणार आहोत. चिमणी वाचली पाहिजे, वावरली पाहिजे यासाठी अकाेलेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

अमाेल सावंत, पक्षिप्रेमी निसर्गकट्टा

 

अकोल्यातील परिसरात ५ ते १० चिमण्या दिसण्याचे प्रमाण ३३.९% , १० ते २० चिमण्या दिसण्याचे प्रमाण ३८%, ५० ते १०० चिमण्या दिसण्याचे प्रमाण २२.२% तर चिमण्या न दिसण्याचे प्रमाण ५.९% आहे.

अकोला जिल्ह्यात १२ महिने चिमण्या दिसण्याचे प्रमाण ४२% आहे, उन्हाळ्यात २४.१%, पावसाळ्यात १३.३% व हिवाळ्यात २०.६% चिमण्या दिसतात.

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी ८९.७% लोकांनी आपल्या अंगणात चिमण्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवले आहे.

तर ८२.३% लोकांनी चिऊताईसाठी अन्नाची व्यवस्था केली आहे.

७२.५% लोकांनी चिमणीसाठी कृत्रिम घरटे लावले आहेत. तर ९५.४% लोकांनी त्यांच्या परिसरात चिमण्यांसाठी हक्काचा निवारा म्हणेज कृत्रिम घरटे लावण्याची मागणी केली आहे. तर फक्त 5% लोकांनी कृत्रिम घरटे लावण्यास नकार दिला आहे.

३८.४% भागांमध्ये मोबाईल टॉवरच्या जवळपास चिमण्या राहतात तर ६१.६% भागांमध्ये चिमण्या आहेत त्या भागात मोबाईल टॉवर नाही.

टॅग्स :Akolaअकोलाwildlifeवन्यजीव