शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मनपाच्या रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:29 IST

रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांनी तर सोडाच, खुद्द मनपाचे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनीसुद्धा पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत महापालिक ा प्रशासनाच्यावतीने आयोजित रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांनी तर सोडाच, खुद्द मनपाचे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनीसुद्धा पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे.संपूर्ण देशभरात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिक ा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अकोलेकरांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.२ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्थानिक अग्रसेन चौक ते दुर्गा चौकपर्यंतच्या मार्गावर स्वच्छता अभियान, झाडे लावा-झाडे जगवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा ºहास या विषयांवर सर्व वयोगटातील महिला व पुरुष वर्गांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी स्वत: रांगोळी आणण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. तसेच नाव नोंदणीसाठी ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर रोजी मनपातील आरोग्य विभागात संपर्क साधण्याची सूचना केली होती. स्पर्धेत प्रथम आलेल्या महिला व पुरुषांना प्रथम पुरस्कार तीन हजार रुपये, द्वितीय पुरस्कार दोन हजार तसेच तृतीय पुरस्काराची रक्कम एक हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात २ आॅक्टोबर रोजी या स्पर्धेकडे कोणीही फिरकले नसल्याचे समोर आले.नियोजनशून्य कारभाराचा नमुनारांगोळी स्पर्धेसंदर्भात आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांनी मनपातील सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून अवगत केले होते. आज रोजी मनपा आस्थापनेवर १८०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अवघे तीनशे ते चारशे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याने या स्पर्धेत सहभाग नोंदवला असता तर अकोलेकरांना सामाजिक संदेश देता आला असता. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा उत्तम नमुना यानिमित्ताने पाहावयास मिळाला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका