शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

मनपाच्या रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:29 IST

रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांनी तर सोडाच, खुद्द मनपाचे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनीसुद्धा पाठ फिरविल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत महापालिक ा प्रशासनाच्यावतीने आयोजित रांगोळी स्पर्धेकडे अकोलेकरांनी तर सोडाच, खुद्द मनपाचे कर्मचारी व त्यांच्या नातेवाइकांनीसुद्धा पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे.संपूर्ण देशभरात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिक ा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अकोलेकरांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.२ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्थानिक अग्रसेन चौक ते दुर्गा चौकपर्यंतच्या मार्गावर स्वच्छता अभियान, झाडे लावा-झाडे जगवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा होणारा ºहास या विषयांवर सर्व वयोगटातील महिला व पुरुष वर्गांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी स्वत: रांगोळी आणण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. तसेच नाव नोंदणीसाठी ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर रोजी मनपातील आरोग्य विभागात संपर्क साधण्याची सूचना केली होती. स्पर्धेत प्रथम आलेल्या महिला व पुरुषांना प्रथम पुरस्कार तीन हजार रुपये, द्वितीय पुरस्कार दोन हजार तसेच तृतीय पुरस्काराची रक्कम एक हजार रुपये निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात २ आॅक्टोबर रोजी या स्पर्धेकडे कोणीही फिरकले नसल्याचे समोर आले.नियोजनशून्य कारभाराचा नमुनारांगोळी स्पर्धेसंदर्भात आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांनी मनपातील सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून अवगत केले होते. आज रोजी मनपा आस्थापनेवर १८०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अवघे तीनशे ते चारशे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याने या स्पर्धेत सहभाग नोंदवला असता तर अकोलेकरांना सामाजिक संदेश देता आला असता. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा उत्तम नमुना यानिमित्ताने पाहावयास मिळाला.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका