शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

अकोल्याच्या मश्रुवाला कुटुंबीयांशी जुळलाय महात्मा गांधींचा स्नेहबंध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:03 IST

मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: अकोला हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिले आहे. अकोल्याच्या मातीशी अनेक मातब्बर नेत्यांची नाळ जुळली आहे. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक, राजगुरू, सुखदेव यांचेही या शहराशी एक नाते आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधी यांचासुद्धा अकोला शहराशी स्नेहबंध जुळलेला आहे. बापूजींचे नाते केवळ भावनिक नव्हे, तर रक्ताने जुळलेले आहे. येथील मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे.त्या काळी येथील मश्रुवाला कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. किशोरलाल मश्रुवाला यांचे महात्मा गांधी व कुटुंबीयांसोबत जुळलेले होते. पुढे गांधी परिवारासोबत मश्रुवाला कुटुंबीयांशी कायमचा ऋणानुबंध जुळला. महात्मा गांधी यांचे दुसरे चिरंजीव मणिलाल यांच्यासोबत कनूभाई मश्रुवाला यांची बहीण सुशीलाबेन यांचा ६ जून १९२७ रोजी विवाह झाला होता. अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या विवाह सोहळ्यात महात्मा गांधीसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा अकोल्याशी कायमच स्नेहबंध जुळला. वºहाडात आल्यावर महात्मा गांधी आवर्जुन मश्रुवाला कुटुंबीयांच्या भेटीला येत असत. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन नानाभाई, त्यांचे सुपुत्र कनूभाई, किशोरलाल, शांतिलाल हे व्यवसायासोबतच महात्मा गांधींच्या विचारानुसार स्वातंत्र्यलढ्यात योगदान देत होते. एवढेच नाही, तर मश्रुवाला कुटुंबातील ताराबेन यांनी अकोल्यात त्या काळी पिकेटीन नावाने आंदोलन सुरू करून दारूच्या दुकानांविरुद्ध हल्लाबोल सुरू केला होता. पुढे त्यांनी १९४६ मध्ये अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अशा माधान येथे आश्रम सुरू केला होता. गांधी कुटुंबीयांसोबत मश्रुवाला नातेसंबंधाने एकमेकांत गुंतले होते. महात्मा गांधी यांची नात मनुबेन हिचा विवाहसुद्धा मश्रुवाला कुटुंबात झाला होता. त्यामुळे गांधी कुटुंबीयांचा अकोल्याचा कायमच स्नेहबंध राहिला आहे. महात्मा गांधी यांचा सहवास लाभलेले कनूभार्इंकडे गांधीजींशी जुळलेल्या अनेक आठवणी आहेत. त्यांचे पुतणे प्रियदर्शी कांतिलाल मश्रुवाला यांनी बापूजींच्या काही आठवणी, नातेसंबंधांना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला. अकोल्याशी गांधी कुटुंबाचे असलेले स्नेहबंध, आठवणी खरोखरच एक अनमोल ठेवा आहेत.

सुशीलाबेन यांनी दक्षिण आफ्रिकेत केले कार्यमहात्मा गांधी यांच्या स्नूषा सुशीलाबेन या लग्नानंतर दक्षिण आफ्रिकेत गेल्या. या ठिकाणी त्यांनी पती मणिलाल गांधी यांच्यासोबत काम केले. वर्णभेदाविरुद्ध त्यांनीही आवाज उठविला. त्यानंतर भारतात परत आल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.

महात्मा गांधी यांचे सुपुत्र मणिलाल यांचा माझी आत्या सुशीलाबेन यांच्यासोबत विवाह झाला होता. तेव्हापासून ते आजतागायत गांधी कुटुंबाशी आमचा स्नेहबंध आहे. महात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी आमच्या कुटुंबाशी जुळलेल्या आहेत. गांधी कुटुंबीयांशी नाते, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.-प्रियदर्शी मश्रुवाला, कनूभाई यांचे पुतणे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी