शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अकोल्याच्या मश्रुवाला कुटुंबीयांशी जुळलाय महात्मा गांधींचा स्नेहबंध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:03 IST

मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: अकोला हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र राहिले आहे. अकोल्याच्या मातीशी अनेक मातब्बर नेत्यांची नाळ जुळली आहे. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक, राजगुरू, सुखदेव यांचेही या शहराशी एक नाते आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधी यांचासुद्धा अकोला शहराशी स्नेहबंध जुळलेला आहे. बापूजींचे नाते केवळ भावनिक नव्हे, तर रक्ताने जुळलेले आहे. येथील मश्रुवाला कुटुंबीयांचे बापूजी व्याही होते आणि तोच स्नेहबंध गांधी-मश्रुवाला कुटुंबीयांनी अद्यापही जोपासला आहे.त्या काळी येथील मश्रुवाला कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. किशोरलाल मश्रुवाला यांचे महात्मा गांधी व कुटुंबीयांसोबत जुळलेले होते. पुढे गांधी परिवारासोबत मश्रुवाला कुटुंबीयांशी कायमचा ऋणानुबंध जुळला. महात्मा गांधी यांचे दुसरे चिरंजीव मणिलाल यांच्यासोबत कनूभाई मश्रुवाला यांची बहीण सुशीलाबेन यांचा ६ जून १९२७ रोजी विवाह झाला होता. अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या या विवाह सोहळ्यात महात्मा गांधीसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा अकोल्याशी कायमच स्नेहबंध जुळला. वºहाडात आल्यावर महात्मा गांधी आवर्जुन मश्रुवाला कुटुंबीयांच्या भेटीला येत असत. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन नानाभाई, त्यांचे सुपुत्र कनूभाई, किशोरलाल, शांतिलाल हे व्यवसायासोबतच महात्मा गांधींच्या विचारानुसार स्वातंत्र्यलढ्यात योगदान देत होते. एवढेच नाही, तर मश्रुवाला कुटुंबातील ताराबेन यांनी अकोल्यात त्या काळी पिकेटीन नावाने आंदोलन सुरू करून दारूच्या दुकानांविरुद्ध हल्लाबोल सुरू केला होता. पुढे त्यांनी १९४६ मध्ये अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अशा माधान येथे आश्रम सुरू केला होता. गांधी कुटुंबीयांसोबत मश्रुवाला नातेसंबंधाने एकमेकांत गुंतले होते. महात्मा गांधी यांची नात मनुबेन हिचा विवाहसुद्धा मश्रुवाला कुटुंबात झाला होता. त्यामुळे गांधी कुटुंबीयांचा अकोल्याचा कायमच स्नेहबंध राहिला आहे. महात्मा गांधी यांचा सहवास लाभलेले कनूभार्इंकडे गांधीजींशी जुळलेल्या अनेक आठवणी आहेत. त्यांचे पुतणे प्रियदर्शी कांतिलाल मश्रुवाला यांनी बापूजींच्या काही आठवणी, नातेसंबंधांना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला. अकोल्याशी गांधी कुटुंबाचे असलेले स्नेहबंध, आठवणी खरोखरच एक अनमोल ठेवा आहेत.

सुशीलाबेन यांनी दक्षिण आफ्रिकेत केले कार्यमहात्मा गांधी यांच्या स्नूषा सुशीलाबेन या लग्नानंतर दक्षिण आफ्रिकेत गेल्या. या ठिकाणी त्यांनी पती मणिलाल गांधी यांच्यासोबत काम केले. वर्णभेदाविरुद्ध त्यांनीही आवाज उठविला. त्यानंतर भारतात परत आल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.

महात्मा गांधी यांचे सुपुत्र मणिलाल यांचा माझी आत्या सुशीलाबेन यांच्यासोबत विवाह झाला होता. तेव्हापासून ते आजतागायत गांधी कुटुंबाशी आमचा स्नेहबंध आहे. महात्मा गांधी यांच्या अनेक आठवणी आमच्या कुटुंबाशी जुळलेल्या आहेत. गांधी कुटुंबीयांशी नाते, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.-प्रियदर्शी मश्रुवाला, कनूभाई यांचे पुतणे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी