शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरविरोधी लढ्यात अकोल्याचे हॉस्पिटल महत्वाचे ठरेल - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:48 IST

अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.

अकोला : उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक कॅन्सर रुग्ण महाराष्ट्रात असून, रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेल्या लढा कौतुकास्पद आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहचविण्यास रिलायन्सने प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.रिलायन्स समुहाने येथून जवळच असलेल्या रिधोरा येथे उभारलेल्या कॅन्सर उपचार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. रिलायन्सचे ग्रामीण भागातील हे पहिले कॅन्सर उपचार केंद्र आहे. उद्घाटन सोहळ्याला रिलायन्स हॉस्पीटलच्या चेयरपर्सन टीना अंबानी, राज्याचे वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की राज्यात कोट्यवधी लोकांच्या तपासणी करण्यात आल्या असून, त्यामध्ये १० टक्के लोकांमध्ये कॅन्सर आढळून आला. त्यांचे पुन्हा स्क्रिनिंग करण्यात आले. कॅन्सर हा सर्वाधिक जीवघेणा आजार असून, त्याला पराभूत करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखूमुळे होणार तोंडाचा कॅन्सर हा सर्वाधिक तरुणांमध्ये आढळून येतो. रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेला लढा कौतुकास्पद आहे. रिलायन्समुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशात कॅन्सर हॉस्पिटलचे ग्रीड तयार होत आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान रिलायन्समुळे ग्रामीण भागात पोहचले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRelianceरिलायन्स