शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कॅन्सरविरोधी लढ्यात अकोल्याचे हॉस्पिटल महत्वाचे ठरेल - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:48 IST

अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.

अकोला : उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक कॅन्सर रुग्ण महाराष्ट्रात असून, रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेल्या लढा कौतुकास्पद आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहचविण्यास रिलायन्सने प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.रिलायन्स समुहाने येथून जवळच असलेल्या रिधोरा येथे उभारलेल्या कॅन्सर उपचार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. रिलायन्सचे ग्रामीण भागातील हे पहिले कॅन्सर उपचार केंद्र आहे. उद्घाटन सोहळ्याला रिलायन्स हॉस्पीटलच्या चेयरपर्सन टीना अंबानी, राज्याचे वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की राज्यात कोट्यवधी लोकांच्या तपासणी करण्यात आल्या असून, त्यामध्ये १० टक्के लोकांमध्ये कॅन्सर आढळून आला. त्यांचे पुन्हा स्क्रिनिंग करण्यात आले. कॅन्सर हा सर्वाधिक जीवघेणा आजार असून, त्याला पराभूत करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखूमुळे होणार तोंडाचा कॅन्सर हा सर्वाधिक तरुणांमध्ये आढळून येतो. रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेला लढा कौतुकास्पद आहे. रिलायन्समुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशात कॅन्सर हॉस्पिटलचे ग्रीड तयार होत आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान रिलायन्समुळे ग्रामीण भागात पोहचले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRelianceरिलायन्स