शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

कॅन्सरविरोधी लढ्यात अकोल्याचे हॉस्पिटल महत्वाचे ठरेल - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:48 IST

अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.

अकोला : उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक कॅन्सर रुग्ण महाराष्ट्रात असून, रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेल्या लढा कौतुकास्पद आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहचविण्यास रिलायन्सने प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.रिलायन्स समुहाने येथून जवळच असलेल्या रिधोरा येथे उभारलेल्या कॅन्सर उपचार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. रिलायन्सचे ग्रामीण भागातील हे पहिले कॅन्सर उपचार केंद्र आहे. उद्घाटन सोहळ्याला रिलायन्स हॉस्पीटलच्या चेयरपर्सन टीना अंबानी, राज्याचे वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की राज्यात कोट्यवधी लोकांच्या तपासणी करण्यात आल्या असून, त्यामध्ये १० टक्के लोकांमध्ये कॅन्सर आढळून आला. त्यांचे पुन्हा स्क्रिनिंग करण्यात आले. कॅन्सर हा सर्वाधिक जीवघेणा आजार असून, त्याला पराभूत करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखूमुळे होणार तोंडाचा कॅन्सर हा सर्वाधिक तरुणांमध्ये आढळून येतो. रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेला लढा कौतुकास्पद आहे. रिलायन्समुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशात कॅन्सर हॉस्पिटलचे ग्रीड तयार होत आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान रिलायन्समुळे ग्रामीण भागात पोहचले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRelianceरिलायन्स