शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या लोकसंवादात अकोला वेटींगवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:55 IST

अकोल्याचे शेतकरी संवादासाठी सकाळी ११ वाजतापासून उपस्थित होते; मात्र त्यांचा नंबर आलाच नाही. लोकसंवादात अकोला वेटींगवरच राहिला.

अकोला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील जालना, पालघर, अहमदनगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव, यवतमाळ आदी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी आज लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. यावेळी अकोल्याचे शेतकरी संवादासाठी सकाळी ११ वाजतापासून उपस्थित होते; मात्र त्यांचा नंबर आलाच नाही. लोकसंवादात अकोला वेटींगवरच राहिला. यावेळी शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, शास्त्रकर आदी उपस्थित होते.लोकसंवाद कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्ही.सी. सभागृहात जिल्ह्यातील विविध कृषी योजनांचा लाभ घेतलेले प्रवीण दांदळे, खिरपुरी, ता. बाळापूर, वर्षा केशवराव ठाकरे, कान्हेरी सरप, ता. बार्शीटाकळी, विनोद भटकर, पाटखेड, ता. बार्शीटाकळी, उमेश रमेश फुलारी, पातूर, शंकर लहामगे, आलेगाव, ता. पातूर, पुरुषोत्तम दिनकर चतरकर, कापशी रोड, ता. अकोला, महेंद्र धर्मा चक्रनारायण, अकोला, महेंद्र अरुणराव काळे, सांगळूद, ता. अकोला, भीमराव सदाशिव, यावलखेड, ता. अकोला, प्रवीण पंजाबराव खोत, समशेरपूर, ता. मूर्तिजापूर, विठ्ठल आनंदराव वाकोडे, जामडी खु., ता. मूर्तिजापूर, सतीश अशोक बोंद्रे, शिवापूर, नेव्हरी, ता. अकोट, सत्यनारायण गोविंदराव म्हसाये, वारखेड, ता. तेल्हारा, दिनेश श्रीराम देवकर, तळेगाव खु. ता. तेल्हारा आदी लाभार्थी उपस्थित होते. सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी व्हिसी सुरू झाली. दुपारी २.३० वाजता व्हिसी संपली; मात्र या संपूर्ण कालावधीत अनेक जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधण्यातच वेळ गेल्यामुळे अकोल्यातील शेतकºयांचा नंबर लागलाच नाही. वेळेची मर्यादा लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत एकत्रित संवाद साधणेच उचित समजले. मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, तसेच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल, म्हणून २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं ध्येय निश्चित आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली १६,००० गावं जलपरिपूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे ३४ लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर पीक उत्पादनामध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळं तर महाराष्ट्राचा कायापालट होऊ घातला आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्यानं पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे, असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी