शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या लोकसंवादात अकोला वेटींगवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:55 IST

अकोल्याचे शेतकरी संवादासाठी सकाळी ११ वाजतापासून उपस्थित होते; मात्र त्यांचा नंबर आलाच नाही. लोकसंवादात अकोला वेटींगवरच राहिला.

अकोला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील जालना, पालघर, अहमदनगर, परभणी, वाशिम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव, यवतमाळ आदी जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी आज लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. यावेळी अकोल्याचे शेतकरी संवादासाठी सकाळी ११ वाजतापासून उपस्थित होते; मात्र त्यांचा नंबर आलाच नाही. लोकसंवादात अकोला वेटींगवरच राहिला. यावेळी शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, शास्त्रकर आदी उपस्थित होते.लोकसंवाद कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्ही.सी. सभागृहात जिल्ह्यातील विविध कृषी योजनांचा लाभ घेतलेले प्रवीण दांदळे, खिरपुरी, ता. बाळापूर, वर्षा केशवराव ठाकरे, कान्हेरी सरप, ता. बार्शीटाकळी, विनोद भटकर, पाटखेड, ता. बार्शीटाकळी, उमेश रमेश फुलारी, पातूर, शंकर लहामगे, आलेगाव, ता. पातूर, पुरुषोत्तम दिनकर चतरकर, कापशी रोड, ता. अकोला, महेंद्र धर्मा चक्रनारायण, अकोला, महेंद्र अरुणराव काळे, सांगळूद, ता. अकोला, भीमराव सदाशिव, यावलखेड, ता. अकोला, प्रवीण पंजाबराव खोत, समशेरपूर, ता. मूर्तिजापूर, विठ्ठल आनंदराव वाकोडे, जामडी खु., ता. मूर्तिजापूर, सतीश अशोक बोंद्रे, शिवापूर, नेव्हरी, ता. अकोट, सत्यनारायण गोविंदराव म्हसाये, वारखेड, ता. तेल्हारा, दिनेश श्रीराम देवकर, तळेगाव खु. ता. तेल्हारा आदी लाभार्थी उपस्थित होते. सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी व्हिसी सुरू झाली. दुपारी २.३० वाजता व्हिसी संपली; मात्र या संपूर्ण कालावधीत अनेक जिल्ह्यातील शेतकºयांशी संवाद साधण्यातच वेळ गेल्यामुळे अकोल्यातील शेतकºयांचा नंबर लागलाच नाही. वेळेची मर्यादा लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत एकत्रित संवाद साधणेच उचित समजले. मुख्यमंत्र्यांनी शेतकºयांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, तसेच शेती परवडेल आणि शेतकरी जगेल, म्हणून २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं ध्येय निश्चित आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली १६,००० गावं जलपरिपूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे ३४ लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर पीक उत्पादनामध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळं तर महाराष्ट्राचा कायापालट होऊ घातला आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्यानं पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे, असे स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी