शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

अकोला जि.प. च्या बंद होणार्‍या ३३ शाळांच्या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:39 PM

अकोला : एकीकडे खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देतानाच सरकारने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या या  निर्णयाचा फटका पश्‍चिम वर्‍हाडातील ३३ शाळांना बसला आहे.

ठळक मुद्देपश्‍चिम वर्‍हाडातील चित्र चिमुकल्या विद्यार्थ्यांची सात ते दहा किमीपर्यंत पायपीट!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एकीकडे खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देतानाच सरकारने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या या  निर्णयाचा फटका पश्‍चिम वर्‍हाडातील ३३ शाळांना बसला आहे. या  बंद होणार्‍या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अंतर ७ ते १0  किमी आहे. शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार असून, अर्थिक भुर्दंडही सहन करावा लागणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना एक किमीच्या आतच शिक्षणाची सोय असावी, अशी तरतूद आहे;  जिल्हा परिषदेने अनेक गावांमध्ये शाळा सुरू करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली; मात्र या शाळांमध्ये पुरेशी विद्यार्थी संख्याच नाही. शिक्षणाचा दर्जा व गुणवत्तेच्या कारणामुळे पटसंख्या खालावली आहे. त्यामुळे त्या शाळाच बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला.  अकोल्यात १७, बुलडाण्यात ८, वाशिममध्ये ९ शाळा बंद झाल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगली गुणवत्ता असलेल्या शाळेत टाकण्याची तयारी केली. यासाठी तीनही जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केला. प्रस्तावाला मंजुरीनंतर बंद होणार्‍या  शाळांतील चिमुकल्यांना आता किमान सात ते कमाल १0 किलोमीटरपर्यंंतच्या शाळेत समायोजित व्हावे लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना येणार्‍या खर्चाच्या भुर्दंंडाला सामोरे जावे लागणार आहे.  

विद्यार्थ्यांंना मिळावी परिवहन सुविधाज्या गावांमध्ये कमी विद्यार्थी संख्येअभावी शाळा सुरू करणे शक्य नाही, अशा गावांमधील विद्यार्थी इतर गावांमध्ये शिक्षणासाठी जात असतील तर त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून ३00 रुपये प्रतिमहा असे दहा महिन्यांचे ३ हजार रुपये मिळतात. तोच नियम बंद होणार्‍या या शाळांसाठी लावण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.