शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

अकोला जिल्हा परिषदेचा कारभार आता संगणकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 2:12 PM

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे.

अकोला: जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक लाभाच्या योजना, विकासकामे आणि प्रशासकीय कामांचा आढावा संदर्भातील कामकाज आता संगणक प्रणालीद्वारे करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदमार्फत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘एमकेसीएल’ कंपनीसोबत लवकरच करार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिली.जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषदमार्फत सद्यस्थितीत ३५ प्रकारच्या विविध योजना राबविण्यात येतात. योजनांची गुणवत्ता जपण्यासाठी आणि योजनांचा लाभ देण्याच्या प्रक्रियेत पुनरावृत्ती (रिपीटेशन) होऊ नये तसेच योजनांचा लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या योजना संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. विकासकामे आणि प्रशासकीयदृष्ट्या कामांचा आढावादेखील या प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे. त्यामुळे कामासाठी लागणारा वेळ, अर्जांसाठी लाभार्थींचा होणारा खर्च वाचणार असून, कामानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज भासणार नाही आणि जिल्हा परिषदेचे कामकाज कागदविरहित (पेपरलेस) होणार असल्याचेही सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे,जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे उपस्थित होते.पाणीटंचाईच्या तक्रार निवारणासाठी यंत्रणा सज्ज!जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई संदर्भात तक्रार निवारणासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असून, पाणीटंचाई निवारणासाठी गावनिहाय उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार असल्याची माहिती सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली. भूजल पातळी खोल गेल्याने जिल्ह्यात १०५ हातपंप बंद पडले असून, १४ व्या वित्त आयोगांतर्गत निधीतून हातपंप दुरुस्तीची कामे करण्यत येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.प्रत्येक ग्रा.पं. अंतर्गत ‘रोहयो’चे एक काम!महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किमान एक काम सुरू करण्यात येणार आहे, त्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले आहे, असे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले.६४ गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा!खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उचल करण्याकरिता दोन पंप नादुरुस्त झाल्याच्या स्थितीत सुकळी येथील तलावातून तात्पुरत्या स्वरूपात ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद