शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

अकोला : शेकाप, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते स्थानबद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:30 IST

अकोला: बळीराजा जलसंजीवनी योजना शुभारंभ कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये,  या दृष्टिकोनातून पोलिसांनी रविवारी फारच खबरदारी घेतली. शासनाचा निषेध करण्यासाठी  वाळलेले सोयाबीन आणि कपाशीची बोंडे घेऊन आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी  गांधीग्राम पुलाजवळूनच ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई शिवसैनिकांकडून वाळलेले सोयाबीन, कपाशीची बोंडे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बळीराजा जलसंजीवनी योजना शुभारंभ कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये,  या दृष्टिकोनातून पोलिसांनी रविवारी फारच खबरदारी घेतली. शासनाचा निषेध करण्यासाठी  वाळलेले सोयाबीन आणि कपाशीची बोंडे घेऊन आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी  गांधीग्राम पुलाजवळूनच ताब्यात घेतले. तसेच शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी जागर मंच,  शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना सायंकाळपर्यंत स्थानबद्ध करून  ठेवले. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, कर्जमाफी या मुद्यांवरून विरोधी पक्ष रान  उठवत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातही विरोधी पक्ष कार्यक र्त्यांसोबतच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याची शक्यता होती. त्यामुळे  पोलीस शनिवार रात्रीपासूनच कामाला लागले होते. अकोट येथील शिवसैनिक रोशन पर्व तकार, मुकेश निचळ, बजरंग गोतमारे यांच्यासह काही कार्यकर्ते वाळलेली सोयाबीनची  झाडे, गुलाबी अळीच्या आक्रमणामुळे सडलेली कपाशीची बोंडे घेऊन शासनाचा निषेध  करण्याच्या उद्देशाने गांधीग्राम येथील सभास्थळी येत होते; परंतु पोलिसांनी, त्यांना गांधीग्राम  पुलाजवळूनच ताब्यात घेतले आणि अकोट पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना सायंकाळपर्यंत स् थानबद्ध करून ठेवले.  ठिकठिकाणी पोलीस सभास्थळी येणार्‍या प्रत्येकाची तपासणी करीत  होते. सभागृहातील शेतकरी, कार्यकर्त्यांवरसुद्धा पोलीस नजर ठेवून होते. 

शेकापचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात ११ डिसेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाने उगवा फाट्यावर पिके जाळून आंदोलन केले  होते. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात शेकापच्या कार्यकर्त्यांनी निषेध करू नये. यासाठी पोलिसांनी  शेकापचे प्रदेश चिटणीस भाई प्रदीप देशमुख, जिल्हा चिटणीस दिनेश काठोके, बाळूभाऊ  ढगे यांना घरून सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात बोलाविले आणि त्यांना सायंकाळी ५  वाजेपर्यंत अकोट फैल पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले. नंतर त्यांची सुटका  करण्यात आली.

काळय़ा रंगाचे शर्ट परिधान केलेल्यांना रोखलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय येऊ नये, विरोधी पक्षांच्या  पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शासनाचा निषेध करता येऊ नये, यासाठी पोलीस प्रत्येकाची  जबाबदारीने तपासणी करीत होते. कार्यक्रमामध्ये काळय़ा रंगाचे शर्ट, टी-शर्ट घालून  आलेल्या नागरिकांनाही त्याचा फटका बसला. काळे शर्ट, टी-शर्ट परिधान करून  शासनाचा निषेध करू नये, यासाठी पोलीस काळय़ा रंगाचे कपडे घालून आलेल्यांना  सभामंडपात जाण्यापासून रोखत होते. काळय़ा कपड्यांमुळे अनेकांना सभामंडपात जाण्या पासून वंचित राहावे लागले. सामान्य नागरिकांसोबतच पत्रकारांनासुद्धा याचा फटका  बसला. 

शेतकरी जागर मंचाची घोषणाबाजीमाजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेतकरी जागर मंचाने केलेल्या  आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या मागण्यांच्या  अंमलबजावणीचे आश्‍वासन दिले होते. या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी शेतकरी  जागर मंचाचे कार्यकर्ते गांधीग्रामला गेले होते; परंतु या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा  पोलिसांनी, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश पाटील मुरूमकार, मनोज तायडे,  कृष्णा अंधारे, ज्ञानेश्‍वर गावंडे, दीपक गावंडे, तेजराव भाकरे, राजू गवई, सुरेश महानकर,  संजय भाकरे, सतीश फाले आदींना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांची शेतकरी जागर  मंचाच्या कार्यकर्त्यांसोबत शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे शेतकरी जागर मंचाने  घोषणाबाजी करून पोलिसांचा निषेध केला. कार्यकर्त्यांंना अकोट पोलीस ठाण्यात स्थानबद्ध  करून, सायंकाळी सोडण्यात आले.

झाडाझडती आंदोलनापूर्वीच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यातगांधीग्राम येथील सिंचन प्रकल्प शुभारंभ कार्यक्रमादरम्यान शेतकरी संघटनेतर्फे झाडाझडती  आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष  वेधण्यात येणार होते; परंतु हे आंदोलनच पोलिसांनी दडपून टाकले आणि शेतकरी  संघटनेचे राज्य प्रवक्ता ललित बहाळे यांना अकोट येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच शे तकरी संघटनेचे प. विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा, जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, विलास ता थोड, डॉ. नीलेश पाटील, दिनेश लोहोकार यांना गांधीग्राम येथील कार्यक्रमस्थळावरून  पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अकोट पोलीस ठाण्यात आणून त्यांना सायंकाळपर्यंत स् थानबद्ध करून ठेवले.

भाजपचे नगरसेवक ‘सिटी बस’मध्ये !भाजपचे नगरसेवक रविवारी एका सिटी बसमध्ये बसून, त्यावर भाजपचा फलक लावून,  गांधीग्राम येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या  कार्यक्रमाला आले होते. सिटीबस मध्ये बसून भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी आल्याने  अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपच्या नगरसेवकांनी सिटी बसचे १00 रुपये सीट प्रमाणे मनपा प्रशासनाकडे शुल्क जमा केले होते. त्यानंतरच मनपा प्रशासनाने, भाजप  नगरसेवकांना सिटी बस उपलब्ध करून दिली. 

नागरिकांसाठी निवेदन कक्षनागरिक, शेतकरी हे विविध समस्या, मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन सादर करतात. निवेदन  देण्यासाठी अनेकजण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंंत पोहोचतात. त्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय येतो. हे  टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सभास्थळीच निवेदन कक्ष उभारला होता. या कक्षात  नागरिक, शेतकर्‍यांकडून अधिकार्‍यांनी विविध विषयांची ५७ निवेदने स्वीकारली. 

शेतकर्‍यांनी खाली बसून ऐकली भाषणेसभामंडपामध्ये शेतकरी, नागरिक, ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. पुरुषांकडील एकही  खुर्ची रिकामी नसल्याने, जिल्हय़ातून आलेल्या शेतकरी, भाजप कार्यकर्त्यांंनी सभामंड पासमोरील जागेवर बसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसं पदा मंत्री गिरीश महाजन, खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची  भाषणे ऐकली. - 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीagitationआंदोलन