शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘वंचित’, एमआयएम जागा वाटपातही होणार गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 12:12 IST

अ‍ॅड. आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यातील पाचपैकी तीन मतदारसंघावर एमआयएमचा डोळा असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

- राजेश शेगोकार

अकोला: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयांची गणिते बिघडविणारी वंचित बहुजन आघाडी व एमआयएम या जोडीने आता विधानसभेसाठी पुन्हा एकदा एकत्रीतरीत्या समोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. एमआयएमने वंचितकडे आघाडीमध्ये १०० जागा लढविण्याबाबत ई-मेलद्वारे प्रस्ताव दिल्याची चर्चा असून, हा प्रस्तावच वंचितच्या तयारीमध्ये जागा वाटप हा मुद्दा तिढा निर्माण करण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीसाठी मुस्लीम, दलित व वंचित बहुजन अशा व्होट बँकेला कॅश करण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाऊल उचलले होते. त्याचा फटका काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसला तब्बल १५ लोकसभा मतदारसंघात बसला. त्यामुळे आता काँग्रेसने वंचितसोबत आघाडी करण्यासाठी अनुकूलता दाखविली आहे. आघाडीमध्ये वंचितला जागा किती, हा कळीचा मुद्दा असल्याने काँगे्रस आघाडीसोबतची चर्चाही अजून प्राथमिक अवस्थेतच आहे. दुसरीकडे एमआयएमने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मिळविलेल्या यशामुळे तसेच वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे एमआयएमलाही महत्त्वाकांक्षेचे घुमारे फुटले आहेत. वंचितच्या मतदारांनी एमआयएमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास राज्यातील १०० मतदारसंघात निकाल फिरू शकतात, असा दावा एमआयएमकडून केला जात असून, त्यामधूनच शंभर जागांची मागणी पुढे आल्याची चर्चा आहे. अ‍ॅड. आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यातील पाचपैकी तीन मतदारसंघावर एमआयएमचा डोळा असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच जागा वाटप या मुद्यावरून वंचित व एमआयएम यांच्यामध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित व एमआयएमच्या आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. विधानसभेसाठीही आम्ही सज्ज आहोत. जागा वाटपाबाबत अद्यापपावेतो चर्चेची बैठक झालेली नाही. बाळासाहेबांनी एमआयएमसोबत चर्चेकरिता मनोहर रोकडे, शंकरलाल बारिंगे, सुभाष तन्वर यांची नियुक्त केली आहे. सध्या तरी केवळ माध्यमांमध्येच चर्चा आहे.- अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष, भारिप-बमसं.

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोला