शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

पिण्याचे पाणी मिळेना, उपाययोजना होइना; पाणीटंचाई निवारणाचा आराखडा कागदावरच

By संतोष येलकर | Updated: May 27, 2023 16:00 IST

जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ८३ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली.

अकोला - कडाक्याच्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाइचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असतानाच, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसताना, पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना मात्र होत नसल्याचे वास्तव आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी एप्रिल ते जून या कालावधीसाठी पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या या आराखड्यात जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध ७८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, उपाययोजनांच्या कामांसाठी ६४ लाख ४२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. परंतु अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध गावांत ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करीत पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. टंचाईग्रस्त गावांत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसताना, पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यातील उपाययोजनांची कोणतीही कामे मात्र सुरू नसल्याचे वास्तव आहे.

कृती आराखड्यातील प्रस्तावित गावे आणि उपाययोजना !

  • तालुका            गावे उपाययोजना
  • अकोला            ०६             ०६
  • बार्शिटाकळी ०८             ०८
  • बाळापूर             ११             १४
  • पातूर             १६             १६
  • मूर्तिजापूर ०५            ०५
  • अकोट            १६             १८
  • तेल्हारा १६             १६

 

एकही उपाययोजनेचे काम नाही सुरू !जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ८३ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यामध्ये ७२ विहिरींचे अधिग्रहण, २ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, ४ विंधन विहीर आणि ५ कूपनलिकांचा समावेश आहे. परंतु या उपाययोजनांपैकी एकही उपाययोजनेचे काम अद्याप सुरू करण्यात आले नसल्याचे चित्र आहे.

झिरा, व्हाॅल्व्हच्या पाण्यावर भागविली जाते तहान !

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामध्ये कवठा, कोळासा या गावांसह अन्य काही गावांमध्ये नदीपात्रातील झिरा तसेच गावाबाहेरील जलवाहिनीवरील व्हॅल्व्हच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. त्यानुषंगाने तापत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Waterपाणी