शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

पिण्याचे पाणी मिळेना, उपाययोजना होइना; पाणीटंचाई निवारणाचा आराखडा कागदावरच

By संतोष येलकर | Updated: May 27, 2023 16:00 IST

जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ८३ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली.

अकोला - कडाक्याच्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाइचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असतानाच, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसताना, पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना मात्र होत नसल्याचे वास्तव आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी एप्रिल ते जून या कालावधीसाठी पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या या आराखड्यात जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध ७८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, उपाययोजनांच्या कामांसाठी ६४ लाख ४२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. परंतु अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हासोबतच जिल्ह्यातील विविध गावांत ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करीत पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. टंचाईग्रस्त गावांत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसताना, पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यातील उपाययोजनांची कोणतीही कामे मात्र सुरू नसल्याचे वास्तव आहे.

कृती आराखड्यातील प्रस्तावित गावे आणि उपाययोजना !

  • तालुका            गावे उपाययोजना
  • अकोला            ०६             ०६
  • बार्शिटाकळी ०८             ०८
  • बाळापूर             ११             १४
  • पातूर             १६             १६
  • मूर्तिजापूर ०५            ०५
  • अकोट            १६             १८
  • तेल्हारा १६             १६

 

एकही उपाययोजनेचे काम नाही सुरू !जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ८३ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यामध्ये ७२ विहिरींचे अधिग्रहण, २ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, ४ विंधन विहीर आणि ५ कूपनलिकांचा समावेश आहे. परंतु या उपाययोजनांपैकी एकही उपाययोजनेचे काम अद्याप सुरू करण्यात आले नसल्याचे चित्र आहे.

झिरा, व्हाॅल्व्हच्या पाण्यावर भागविली जाते तहान !

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामध्ये कवठा, कोळासा या गावांसह अन्य काही गावांमध्ये नदीपात्रातील झिरा तसेच गावाबाहेरील जलवाहिनीवरील व्हॅल्व्हच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. त्यानुषंगाने तापत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Waterपाणी