शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अकोला : ‘वखार’च्या गोदामातील हजारो क्विंटल धान्य खराब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:40 IST

अकोला : शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी भारतीय खाद्य निगमकडून जिल्हाधिकार्‍यांच्या मागणीनुसार पुरवठा होणारा तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गहू खराब झाला आहे.

ठळक मुद्देधान्य पुरवठा थांबवला एफसीआयच्या पथकाकडून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी भारतीय खाद्य निगमकडून जिल्हाधिकार्‍यांच्या मागणीनुसार पुरवठा होणारा तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गहू खराब झाला आहे. त्याची तपासणी करण्यासाठी निगमच्या तीन अधिकार्‍यांच्या पथकाने गुरुवारी गोदामात तपासणी केली, तसेच गहू, तांदळाच्या साठय़ात तफावत असल्याच्या कारणावरून गेल्या दोन महिन्यांपासून धान्य पुरवठाही बंद करण्यात आला आहे.सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी राज्य शासन भारतीय खाद्य निगमकडून धान्याची खरेदी करते. धान्याचा पुरवठा करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने अकोला एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम भाड्याने घेत तेथे साठा केला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी मागणी केल्यानुसार गहू, तांदळाचा पुरवठा वखारच्या गोदामातून केला जातो. गेल्या दोन वर्षात भारतीय खाद्य निगमने वखारच्या गोदामात साठा केलेल्या गहू, तांदळाच्या साठय़ात मोठी तफावत असल्याची माहिती आहे. उपलब्ध साठय़ापैकी मोठय़ा प्रमाणात धान्य खराब झाले. ते धान्य जिल्हाधिकार्‍यांच्या शासकीय गोदामांना तसेच लाभार्थींना वाटप करण्याची तयारी राज्य वखार महामंडळाच्या व्यवस्थापनाने केली. त्यापूर्वीच धान्याच्या गुणवत्तेची तसेच गोदामातील साठय़ाची तपासणी करण्यासाठी खाद्य निगमच्या तीन अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या पथकाने वखारच्या गोदामात धडक दिली. खराब झालेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गव्हाची पाहणी पथकाने केली. तपासणी अहवाल भारतीय खाद्य निगमच्या वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाणार आहे. 

दोन महिन्यांपासून धान्याचा पुरवठा बंदभारतीय खाद्य निगमने धान्य साठा करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या राज्य वखार महामंडळाच्या गोदामात गेल्या दोन वर्षांपासून साठा केलेला गहू आणि तांदूळ कमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे या गोदामातील साठा शून्य करून धान्याचा हिशेब जुळवण्याचे पत्र निगमने दोन महिन्यांपूर्वीच वखार महामंडळाला दिले आहे. तेव्हापासून भारतीय खाद्य निगमने या गोदामात धान्याचा पुरवठाही थांबवला. त्यामुळे खराब झालेल्या धान्य साठय़ाची किंमत आता वखार महामंडळाकडून वसूल करण्याची तयारी खाद्य निगमने केली आहे.

वखारच्या दुर्लक्षामुळे धान्य खराब खाद्य निगमकडून वखार महामंडळाला गोदामात धान्य सुस्थितीत ठेवण्याचे भाडे दिले जाते. ते खराब किंवा अपहार झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वखार महामंडळावर आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तांदूळ व गहू खराब झाल्याने त्याची नुकसानभरपाई आता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडून वसूल होण्याची शक्यता आहे. 

गोदामात दोन महिन्यांपासून शासकीय धान्याची आवक बंद आहे. तांदळाच्या साठय़ाचा तपासणी अहवाल खाद्य निगमच्या पथकाकडून वरिष्ठांना सादर होईल, त्यानंतर त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतला जाणार आहे. - एस.जी.ढवळे, भांडार व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती