शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

अकोला : महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिक्षकच मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:54 IST

अकोला : राज्य शासनाने २0१२-१३ मध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरती करताना, जातीच्या संवर्गानुसार राखीव पदे भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयांना राखीव संवर्गातील तासिका तत्त्वावर शिक्षकच सापडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णयाचा वरिष्ठ महाविद्यालयांसोबत कनिष्ठ महाविद्यालयांनाही फटका बसत असून, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. 

ठळक मुद्देसंवर्गाचा निर्णय मागे घेण्याची मागणी शासन निर्णयाचा विद्यार्थ्यांना फटका

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने २0१२-१३ मध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरती करताना, जातीच्या संवर्गानुसार राखीव पदे भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयांना राखीव संवर्गातील तासिका तत्त्वावर शिक्षकच सापडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णयाचा वरिष्ठ महाविद्यालयांसोबत कनिष्ठ महाविद्यालयांनाही फटका बसत असून, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने २0१२-१३ मध्ये ‘जीआर’ काढून तासिका तत्त्वावरची शिक्षक पदे भरताना ज्या संवर्गाकरिता पद राखीव आहे, त्याच संवर्गातील शिक्षकांची तासिका तत्त्वावरील पदावर भरती करण्याचा आदेश दिला. हा निर्णय सकारात्मक असला, तरी वरिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या विविध संवर्गातील राखीव पदांवर शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर शिक्षकच मिळत नसल्याने, शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यापूर्वी कमी खर्चामध्ये तासिका तत्त्वावर विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम शिक्षक करीत होते; परंतु आता राज्यातील विद्यापीठे शासन निर्णयाची अंमलबजावणी २0१७-१८ मध्ये करीत आहेत आणि विद्यापीठांनी ज्या संवर्गामधील पद राखीव आहे, त्याच संवर्गातील शिक्षकाची तासिका तत्त्वावर नियुक्ती करावी, असे म्हणत संवर्गानुसार राखीव पदावर शिक्षक नियुक्त न केल्यास त्यांना मान्यता मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे शासनाने पदे भरण्यास बंदी घातली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात तासिका शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर शिक्षक मिळणेही दुरापास्त झाले आहे. एवढेच नाही, तर जिल्हा स्तरावरसुद्धा काही विषय शिकविण्यासाठी विविध संवर्गातील शिक्षक तासिका तत्त्वावर उपलब्ध होत नाहीत. त्यातही अल्प मानधन आणि संवर्गाची अट असल्यामुळे कोणताही शिक्षक तासिका तत्त्वावर शिकविण्यास तयार होत नसल्याचे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दिसून येत आहे. तासिका तत्त्वावरील पदे ही तात्पुरती असून, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ती एक व्यवस्था आहे. तेही शासन बंद करण्याच्या मार्गावर आहे. शासनाने संवर्ग न पाहता, तासिका तत्त्वावरील शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून होत आहे. 

राखीव संवर्गातील पदे भरण्यास विरोध नाही; परंतु विविध संवर्गात पूर्णवेळ शिक्षकच मिळत नाही. तेथे संवर्गातील पदांवर तासिका तत्त्वावर शिक्षक कोठून मिळणार, असा प्रश्न आहे. तासिका तत्त्वावर शिक्षक नेमणे ही तात्पुरता व्यवस्था आहे. त्यामुळे शासनाने संवर्गाची अट काढून, शिक्षक नेमण्यास परवानगी द्यावी. - डॉ. सुभाष भडांगे, प्राचार्य,शिवाजी महाविद्यालय, अकोला.

तासिका तत्त्वावर शिक्षक भरताना आरक्षण हा नियम लावू नये. शासनाने आरक्षणानुसार पूर्णवेळ पदे भरण्याची परवानगी दिली, तर तासिका तत्त्वावरील रिक्त पदांचा प्रश्नच मिटतो. तासिका तत्त्वावर काम करण्यासाठी एसटी, व्हीजेएनटी संवर्गातील शिक्षकच मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. - डॉ. आर.डी. सिकची, अध्यक्ष प्राचार्य फोरम.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcollegeमहाविद्यालयTeacherशिक्षक