शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अकोला : महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिक्षकच मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:54 IST

अकोला : राज्य शासनाने २0१२-१३ मध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरती करताना, जातीच्या संवर्गानुसार राखीव पदे भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयांना राखीव संवर्गातील तासिका तत्त्वावर शिक्षकच सापडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णयाचा वरिष्ठ महाविद्यालयांसोबत कनिष्ठ महाविद्यालयांनाही फटका बसत असून, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. 

ठळक मुद्देसंवर्गाचा निर्णय मागे घेण्याची मागणी शासन निर्णयाचा विद्यार्थ्यांना फटका

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने २0१२-१३ मध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरती करताना, जातीच्या संवर्गानुसार राखीव पदे भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वरिष्ठ महाविद्यालयांना राखीव संवर्गातील तासिका तत्त्वावर शिक्षकच सापडत नसल्याचे चित्र आहे. शासनाच्या निर्णयाचा वरिष्ठ महाविद्यालयांसोबत कनिष्ठ महाविद्यालयांनाही फटका बसत असून, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने २0१२-१३ मध्ये ‘जीआर’ काढून तासिका तत्त्वावरची शिक्षक पदे भरताना ज्या संवर्गाकरिता पद राखीव आहे, त्याच संवर्गातील शिक्षकांची तासिका तत्त्वावरील पदावर भरती करण्याचा आदेश दिला. हा निर्णय सकारात्मक असला, तरी वरिष्ठ महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या विविध संवर्गातील राखीव पदांवर शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर शिक्षकच मिळत नसल्याने, शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यापूर्वी कमी खर्चामध्ये तासिका तत्त्वावर विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम शिक्षक करीत होते; परंतु आता राज्यातील विद्यापीठे शासन निर्णयाची अंमलबजावणी २0१७-१८ मध्ये करीत आहेत आणि विद्यापीठांनी ज्या संवर्गामधील पद राखीव आहे, त्याच संवर्गातील शिक्षकाची तासिका तत्त्वावर नियुक्ती करावी, असे म्हणत संवर्गानुसार राखीव पदावर शिक्षक नियुक्त न केल्यास त्यांना मान्यता मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे शासनाने पदे भरण्यास बंदी घातली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात तासिका शिकविण्यासाठी तासिका तत्त्वावर शिक्षक मिळणेही दुरापास्त झाले आहे. एवढेच नाही, तर जिल्हा स्तरावरसुद्धा काही विषय शिकविण्यासाठी विविध संवर्गातील शिक्षक तासिका तत्त्वावर उपलब्ध होत नाहीत. त्यातही अल्प मानधन आणि संवर्गाची अट असल्यामुळे कोणताही शिक्षक तासिका तत्त्वावर शिकविण्यास तयार होत नसल्याचे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दिसून येत आहे. तासिका तत्त्वावरील पदे ही तात्पुरती असून, विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ती एक व्यवस्था आहे. तेही शासन बंद करण्याच्या मार्गावर आहे. शासनाने संवर्ग न पाहता, तासिका तत्त्वावरील शिक्षकांची पदे भरण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून होत आहे. 

राखीव संवर्गातील पदे भरण्यास विरोध नाही; परंतु विविध संवर्गात पूर्णवेळ शिक्षकच मिळत नाही. तेथे संवर्गातील पदांवर तासिका तत्त्वावर शिक्षक कोठून मिळणार, असा प्रश्न आहे. तासिका तत्त्वावर शिक्षक नेमणे ही तात्पुरता व्यवस्था आहे. त्यामुळे शासनाने संवर्गाची अट काढून, शिक्षक नेमण्यास परवानगी द्यावी. - डॉ. सुभाष भडांगे, प्राचार्य,शिवाजी महाविद्यालय, अकोला.

तासिका तत्त्वावर शिक्षक भरताना आरक्षण हा नियम लावू नये. शासनाने आरक्षणानुसार पूर्णवेळ पदे भरण्याची परवानगी दिली, तर तासिका तत्त्वावरील रिक्त पदांचा प्रश्नच मिटतो. तासिका तत्त्वावर काम करण्यासाठी एसटी, व्हीजेएनटी संवर्गातील शिक्षकच मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. - डॉ. आर.डी. सिकची, अध्यक्ष प्राचार्य फोरम.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcollegeमहाविद्यालयTeacherशिक्षक