शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला : गावंडगाव येथे युवा शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 20:39 IST

आलेगाव (अकोला): येथून जवळ असलेल्या व चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या गावंडगाव येथील वसंता कान्हू राठोड या ३0 वर्षीय तरूण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणास कंटाळून  १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देवसंता कान्हू राठोड असे ३0 वर्षीय युवा शेतकर्‍याचे नाववसंता राठोड याच्यावर बँकेचे तसेच सावकाराचे कर्ज होतेआत्महत्येपूर्वी वसंताने त्याच्या मुलाकडून लिहून घेतली होती चिठ्ठी

लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव (अकोला): येथून जवळ असलेल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या गावंडगाव येथील वसंता कान्हू राठोड या ३0 वर्षीय तरूण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणास कंटाळून  १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

वसंता राठोड याच्यावर बँकेचे तसेच सावकाराचे कर्ज होते. त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने ती अनेक दिवसांपासून वेगळी राहत होती. पत्नीअभावी घराची,मुलांची चिंता व त्यातच कर्जबाजारीपणा या विवंचनेत कंटाळून अखेर त्याने १२ जानेवारी रोजी सकाळी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पश्‍चात आरती (५ वर्षे) आणि आतिष (७ वर्षे) अशी दोन मुले आहेत. मृतक वसंताने आत्महत्येपूर्वी त्याच्या मुलाकडून चिठ्ठी लिहून घेतली होती. चिठ्ठीमध्ये मृतकाच्या आत्महत्येनंतर त्याचा मुलांचा सांभाळ शासनाने करावा, असे लिहिले आहे. वसता राठोडने मुलाकडून लिहून घेतलेली चिठ्ठी मुलाकडे देऊन नंतर गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. चान्नी पोलिसांना या घटनेबाबत माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनसाठी पाठवून दिला. पण आता वसंता राठोडच्या मुलांचा सांभाळ करणार कोण, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे.  पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणfarmer suicideशेतकरी आत्महत्या