शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Akola: यंदा रब्बीचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने वाढणार, मान्सून विलंबाने दाखल झाल्याचा परिणाम

By रवी दामोदर | Updated: September 18, 2023 12:51 IST

Akola: अकोला जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा ३० हजार हेक्टरने अधिक वाढणार आहे. त्यानुसार, कृषी विभागाने नियोजन केले असून, आवश्यक बियाण्यांच्या व खतांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन केले आहे.

- रवी दामोदरअकोला - जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र सरासरी पेरणी क्षेत्रापेक्षा ३० हजार हेक्टरने अधिक वाढणार आहे. त्यानुसार, कृषी विभागाने नियोजन केले असून, आवश्यक बियाण्यांच्या व खतांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन केले आहे. मान्सून विलंबाने दाखल झाल्याने मूग, उडीद पिके बाद झाली. परिणामी रब्बी क्षेत्र वाढले असून, त्यामध्ये सार्वाधिक क्षेत्र हरभऱ्याचे असणार आहे. यंदा रब्बी हंगामात १ लाख ५८ हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. त्यामध्ये हरभरा पिकाचे क्षेत्र २० ते २५ टक्क्यांनी वाढले असून, तब्बल १ लाख २६ हजार ४६८ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.

गत तीन-चार वर्षांपासून खरीप हंगामात होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. नुकसान झालेले क्षेत्र रब्बीमध्ये वाढत आहे. यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने उडीद, मूग पिके बाद झाली, तर सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे यंदाही रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात पावसाची तूट आहे, परंतु प्रकल्पांमध्ये मुबलक साठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. लहान, मोठे प्रकल्प आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले असून, मोठ्या प्रकल्पांचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

५३ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणीयंदा रब्बी हंगामातील क्षेत्र वाढण्याचा अंदाज असल्याने कृषी विभागामार्फत नियोजन केले आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बियाण्यांची अडचण येऊ नये, यासाठी रब्बी हंगाम २०२३-०२४ करिता तब्बल ५३ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ४१ हजार ६११ क्विंटल सार्वजनिक, तर १२ हजार १८७ क्विंटल खासगी बियाण्यांचा समावेश आहे. तसेच कृषी विभागामार्फत महाबीजकडे ३६ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून, त्यामध्ये २५ हजार क्विंटल हरभरा बियाण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी