शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

बांधकामांसाठी पाणी उपशावर बंदीचा अकोला मनपाचा प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:50 PM

अनिर्बंध पाणी वापरावर व बांधकामांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकाराची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देशहरात पाणीटंचाईची स्थिती असताना दुसरीकडे कमर्शियल कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट, डुप्लेक्स व रहिवासी इमारतींच्या बांधकामाचे चित्र समोर आले. पाण्याचा बेसुमार उपसा व वापर केला जात असल्यामुळे त्याचा परिणाम त्या-त्या भागातील नागरिकांच्या बोअरवर होत असल्याचे दिसून आले.महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ठोस भूमिका घेत शहरातील बांधकामांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

अकोला: मनपा व जिल्हा प्रशासनाने शहराला पाणीटंचाईग्रस्त घोषित केल्यानंतरही शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात कमर्शियल कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट, डुप्लेक्स व रहिवासी इमारतींच्या बांधकामासाठी पाण्याचा बेसुमार उपसा व अपव्यय सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याचा परिणाम नागरिकांच्या बोअरवर होत असल्यामुळे अशा अनिर्बंध पाणी वापरावर व बांधकामांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकाराची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती आहे.शहराची भूजल पातळी खालावल्यामुळे नागरिकांच्या बोअर कोरड्या पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. तत्पूर्वी महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता महापालिका प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाणीटंचाईवरील उपाययोजनांसाठी शासनाने शहरात नवीन ७५ सबमर्सिबल व १२० हातपंपांसाठी १ कोटी २८ लाख रुपये मंजूर केले. दरम्यान, हा निधी खर्च करण्यापूर्वी मनपा व जिल्हा प्रशासनाने शहराला पाणीटंचाईग्रस्त घोषित केल्यानंतरच निधीचा वापर करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी शहर पाणीटंचाईग्रस्त घोषित केले. एकीकडे शहरात पाणीटंचाईची स्थिती असताना दुसरीकडे कमर्शियल कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट, डुप्लेक्स व रहिवासी इमारतींच्या बांधकामाचे चित्र समोर आले. ऐन उन्हाळ््यात होणाºया बांधकामांसाठी पाण्याचा बेसुमार उपसा व वापर केला जात असल्यामुळे त्याचा परिणाम त्या-त्या भागातील नागरिकांच्या बोअरवर होत असल्याचे दिसून आले. किमान पावसाळा सुरू होईपर्यंत शहरातील बांधकामे बंद ठेवण्याची अपेक्षा वर्तविली जात होती. एकीकडे मनपा प्रशासन रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेत असतानाच दुसरीकडे पाण्याच्या अनिर्बंध वापरावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ठोस भूमिका घेत शहरातील बांधकामांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निर्णयाकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

 पाण्याचा अनिर्बंध उपसा; शेजारी संकटातशहरातील पाणी टंचाईचे चित्र पाहता बांधकाम व्यावसायिकांनी किमान पावसाळा सुरु होईपर्यंत त्यांची बांधकामे बंद ठेवणे अपेक्षित होते. तसे होत नसल्याचा परिणाम त्या-त्या भागातील स्थानिक रहिवाशांच्या बोअरवर होत आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्स, रहिवासी इमारती, डुप्लेक्सच्या बांधकामासाठी पाण्याचा अनिर्बंध उपसा होत असल्याने स्थानिकांच्या बोअरची भूजल पातळी कमी होत असल्याचे समोर येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा!नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे मनपाच्या आयुक्तपदाचा प्रभार असताना ते सायंकाळी प्रशासकीय कामकाज आटोपून चक्क दुचाकीवर प्रभागांमध्ये जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत होते. तसेच त्या तडकाफडकी निकाली काढत होते. एक संवेदनशिल अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. कमर्शियल कॉम्प्लेक्स, डुप्लेक्ससाठी पाण्याच्या बेसुमार उपशावर जिल्हाधिकाºयांनी ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका