शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला : उठसुट न्यायालयात धाव घेतलेल्या शिक्षकांना नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:37 IST

अकोला : वरिष्ठांनी नोटीस दिली, कारवाईसाठी स्पष्टीकरण मागवले तरी त्यावर न्यायालयात धाव घेऊन पुढील कारवाईच थांबवण्याचे प्रकार जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी सुरू केले. हा प्रकार शासकीय यंत्रणेत न्याय मिळण्याच्या पद्धतीला फाटा देऊन केला जातो. त्यामुळे संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केली आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक शिक्षकांना नोटीस बजावत स्पष्टीकरण मागवले आहे. 

ठळक मुद्देप्रशासकीय रचनेवर भरवसा नाही का?

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वरिष्ठांनी नोटीस दिली, कारवाईसाठी स्पष्टीकरण मागवले तरी त्यावर न्यायालयात धाव घेऊन पुढील कारवाईच थांबवण्याचे प्रकार जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी सुरू केले. हा प्रकार शासकीय यंत्रणेत न्याय मिळण्याच्या पद्धतीला फाटा देऊन केला जातो. त्यामुळे संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केली आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक शिक्षकांना नोटीस बजावत स्पष्टीकरण मागवले आहे. शिक्षण विभागातील विविध प्रकरणात मोठे घोळ आहेत. नियुक्ती, बदली, आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना देताना तर घोळाचा कळसच झालेला आहे. बिंदूनामावली अंतिम करताना काहीअंशी घोळ दुरुस्त झाला. त्यासाठी शिक्षकांवर कारवाईसाठी नोटीसेस बजावण्यात आल्या. सोबतच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्यांच्या फायली गहाळ असणे, दैनंदिन कामकाजात अनियमितता असणे, कर्तव्यात कसूर करणे, यासह विविध प्रकरणांत शिक्षकांवर कारवाई केली जाते. ती करण्यापूर्वी संबंधितांना नोटीस बजावल्या जातात. ती प्राप्त होताच किंवा कारवाईचा आदेश होताच शिक्षक थेट न्यायालयात धाव घेतात. तेथून पुढील कारवाईस स्थगितीचे आदेश दिले जातात. त्यातून प्रशासकीय कारवाईच थांबवण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून होत आहे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. हा प्रकार शासकीय रचनेतील न्यायपद्धतीला फाटा देत केला जातो. त्यातून कार्यालयीन शिस्तीचा भंग होत आहे, याची जाणही संबंधितांकडून ठेवली जात नाही, हा मुद्दा पकडून शिक्षण विभागाने ज्या शिक्षक, कर्मचाºयांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले, त्या सर्वांना २० फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. 

नियमाचा भंग केल्याने परिपत्रकानुसार कारवाईनोटीसमध्ये नियमाचा भंग केल्याने २८ जुलै १९९९ रोजीच्या शासन परिपत्रकात निर्देशित केल्यानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावण्यात आली.

न्यायपद्धतीच्या अवलंबाला फाटाशासकीय अधिकारी-कर्मचाºयांनी त्यांचे गाºहाणे मांडण्यासाठी पद्धत निश्चित आहे. एखाद्या अधिकाºयाच्या आदेशावर वरिष्ठ अधिकारी, न्याय न मिळाल्यास त्यांचे वरिष्ठ अधिकारी, नंतर सचिव, त्यानंतर मुख्य सचिवाकडे दाद मागता येते. शेवटी मुख्यमंत्र्याकडेही गाºहाणे मांडता येते. मात्र, तसे न केल्याने शिस्तभंग झाल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. 

संबंधितांनी शासन नियमांचा भंग केल्याने नोटीस बजावण्यात आली. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर कारवाई केली जाईल. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद. 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकCourtन्यायालय