शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा; ‘पीएम’आवास योजनेवरून नगरसेवकांमध्ये गोंधळाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:24 IST

अकोला : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ बांधून देण्याचा शासनाचा उद्देश निखळ असला, तरी प्रत्यक्षात कामकाज करताना महापालिकेच्या यंत्रणेची भंबेरी उडाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनकाशात वारंवार केला जातोय बदल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारात लाभार्थींची होत आहे दमछाक

अकोला : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ बांधून देण्याचा शासनाचा उद्देश निखळ असला, तरी प्रत्यक्षात कामकाज करताना महापालिकेच्या यंत्रणेची भंबेरी उडाल्याचे चित्र आहे. तांत्रिक सल्लागार असलेल्या शून्य कन्सलटन्सी व मनपामध्ये ताळमेळ नसल्यामुळे की काय, पात्र लाभार्थींच्या नकाशात वारंवार बदल करणे व नकाशा मंजुरीसाठी दिरंगाई करण्याचे प्रकार होत आहेत. यंत्रणेच्या ढिसाळ कारभारात लाभार्थींची चांगलीच दमछाक होत असून, खुद्द नगरसेवकांमध्येही गोंधळाची स्थिती दिसून येत आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सर्वांना घरे मिळतील, असा गाजावाजा करीत अनेक आजी-माजी नगरसेवकांनी प्रभागांमध्ये स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रकार केला होता. योजनेचा ‘डीपीआर’ तयार करण्याची जबाबदारी असलेल्या व नंतर तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या शून्य कन्सलटन्सीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र होते. त्यामुळे गरजू लाभार्थींनी अर्ज भरण्यासाठी मनपाकडे प्रचंड गर्दी केली. आजरोजी शून्य कन्सलन्टसीकडे ६० हजार अर्ज असून, त्यापैकी केवळ ९३ घरांचे बांधकाम सुरू आहे. जुने शहरातील शिवसेना वसाहतमध्ये १ हजार २५१ घरांचा सर्व्हे केल्यानंतर शासनाकडे ७९३ घरांचा प्रकल्प अहवाल सादर केला. यापैकी फक्त ३१० घरांच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. वर्षभराच्या कालावधीत शून्य कन्सलटन्सीच्या माध्यमातून ९३ घरांचे बांधकाम सुरू केले असता, केवळ पाच घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याची केविलवाणी परिस्थिती आहे. तांत्रिक सल्लागारकडून घरांचा नकाशा तयार के ल्यानंतर नगररचना विभागाने तातडीने मंजुरी देणे अपेक्षित आहे. योजनेचा आवाका व महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने तातडीने नकाशा मंजूर करणे क्रमप्राप्त आहे. नकाशा मंजूर केल्यानंतर कालांतराने तांत्रिक सल्लागारकडून त्यामध्ये पुन्हा फेरबदल केले जात असल्यामुळे लाभार्थींच्या नाकीनऊ आले आहेत.यंत्रणेत सुधारणा कधी?शून्य कन्सलटन्सीने घरांचा सर्व्हे करून ‘डीपीआर’ तयार केल्यानंतर शासनाने काही घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली. अर्थात घरांचे बांधकाम करताना तांत्रिक सल्लागाराने अपेक्षित नकाशा तयार करून तो मंजुरीसाठी नगररचना विभागाकडे सादर केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा दुरुस्त्या का व कशासाठी, असा सवाल उपस्थित होतो. नकाशा मंजुरीच्या नावाखाली नागरिकांना होणाºया त्रासाची दखल घेऊन सत्ताधारी यंत्रणेत सुधारणा करतील का आणि कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर