शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अकोला मनपा; ‘पीएम’आवास योजनेवरून नगरसेवकांमध्ये गोंधळाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:24 IST

अकोला : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ बांधून देण्याचा शासनाचा उद्देश निखळ असला, तरी प्रत्यक्षात कामकाज करताना महापालिकेच्या यंत्रणेची भंबेरी उडाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनकाशात वारंवार केला जातोय बदल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारात लाभार्थींची होत आहे दमछाक

अकोला : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ बांधून देण्याचा शासनाचा उद्देश निखळ असला, तरी प्रत्यक्षात कामकाज करताना महापालिकेच्या यंत्रणेची भंबेरी उडाल्याचे चित्र आहे. तांत्रिक सल्लागार असलेल्या शून्य कन्सलटन्सी व मनपामध्ये ताळमेळ नसल्यामुळे की काय, पात्र लाभार्थींच्या नकाशात वारंवार बदल करणे व नकाशा मंजुरीसाठी दिरंगाई करण्याचे प्रकार होत आहेत. यंत्रणेच्या ढिसाळ कारभारात लाभार्थींची चांगलीच दमछाक होत असून, खुद्द नगरसेवकांमध्येही गोंधळाची स्थिती दिसून येत आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सर्वांना घरे मिळतील, असा गाजावाजा करीत अनेक आजी-माजी नगरसेवकांनी प्रभागांमध्ये स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रकार केला होता. योजनेचा ‘डीपीआर’ तयार करण्याची जबाबदारी असलेल्या व नंतर तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या शून्य कन्सलटन्सीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र होते. त्यामुळे गरजू लाभार्थींनी अर्ज भरण्यासाठी मनपाकडे प्रचंड गर्दी केली. आजरोजी शून्य कन्सलन्टसीकडे ६० हजार अर्ज असून, त्यापैकी केवळ ९३ घरांचे बांधकाम सुरू आहे. जुने शहरातील शिवसेना वसाहतमध्ये १ हजार २५१ घरांचा सर्व्हे केल्यानंतर शासनाकडे ७९३ घरांचा प्रकल्प अहवाल सादर केला. यापैकी फक्त ३१० घरांच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. वर्षभराच्या कालावधीत शून्य कन्सलटन्सीच्या माध्यमातून ९३ घरांचे बांधकाम सुरू केले असता, केवळ पाच घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याची केविलवाणी परिस्थिती आहे. तांत्रिक सल्लागारकडून घरांचा नकाशा तयार के ल्यानंतर नगररचना विभागाने तातडीने मंजुरी देणे अपेक्षित आहे. योजनेचा आवाका व महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने तातडीने नकाशा मंजूर करणे क्रमप्राप्त आहे. नकाशा मंजूर केल्यानंतर कालांतराने तांत्रिक सल्लागारकडून त्यामध्ये पुन्हा फेरबदल केले जात असल्यामुळे लाभार्थींच्या नाकीनऊ आले आहेत.यंत्रणेत सुधारणा कधी?शून्य कन्सलटन्सीने घरांचा सर्व्हे करून ‘डीपीआर’ तयार केल्यानंतर शासनाने काही घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली. अर्थात घरांचे बांधकाम करताना तांत्रिक सल्लागाराने अपेक्षित नकाशा तयार करून तो मंजुरीसाठी नगररचना विभागाकडे सादर केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा दुरुस्त्या का व कशासाठी, असा सवाल उपस्थित होतो. नकाशा मंजुरीच्या नावाखाली नागरिकांना होणाºया त्रासाची दखल घेऊन सत्ताधारी यंत्रणेत सुधारणा करतील का आणि कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर