शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

अकोला महापालिकेने केलेली करवाढ नियमबाह्यच : विभागीय आयुक्तांच्या अहवालात नोंद - अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:31 IST

अकोला: मागील १८ वर्षांमध्ये पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया न राबवता प्रशासनाने थेट ६० टक्क्यांनी करवाढ केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्त, अमरावती यांनी अहवालात नोंदविल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे४० टक्क्यांपेक्षा जास्त करवाढ अपेक्षित नसताना प्रशासनाने ६० टक्के कर आकारणी केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्तांनी नोंदवल्याची माहिती अ‍ॅड.आंबेडकर यांनी दिली.मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रशासनाने रितसर निविदा प्रक्रिया न राबवता स्थापत्य कन्सलटन्सीला काम दिले.विभागीय आयुक्तांचा अभिप्राय ध्यानात घेता यासंदर्भातील पुढील सुनावणी मुख्यमंत्र्यांकडे घेतली जाणार आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे वेळ मागू,असे अ‍ॅड.आंबेडकर यांनी सांगितले.

अकोला: महापालिका प्रशासनाने नगररचना विभागाच्या ‘रेटेबल व्हॅल्यू’नुसार कर आकारणी केली नाही. मालमत्तांचे दर तीन वर्षांनी पुनर्मुल्यांकन करणे अपेक्षित होते. मागील १८ वर्षांमध्ये पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया न राबवता प्रशासनाने थेट ६० टक्क्यांनी करवाढ केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्त, अमरावती यांनी अहवालात नोंदविल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.मनपा प्रशासनाने अकोलेकरांवर लादलेली करवाढ नियमबाह्य असल्याचा मुद्दा भारिप-बहुजन महासंघाने सातत्याने लावून धरला. विभागीय आयुक्त कार्यालयात करवाढीच्या संदर्भात सादर केलेल्या अर्जावर मत नोंदवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी शासनाकडून अभिप्राय मागितला होता. शासनाच्या मंजूरीनंतर विभागीय आयुक्तांनी तेरा पानांचा अहवाल सादर केल्याची माहिती अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. नगररचना विभागाने दिलेल्या ‘रेटेबल व्हॅल्यू’नुसार मनपाने कर आकारणी करण्याची गरज होती. ४० टक्क्यांपेक्षा जास्त करवाढ अपेक्षित नसताना प्रशासनाने मनमानीरित्या ६० टक्के कर आकारणी केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्तांनी नोंदवल्याची माहिती अ‍ॅड.आंबेडकर यांनी दिली. करवाढ केल्यानंतर नागरिकांचे आक्षेप,हरकती निकाली काढण्याचे अधिकार केवळ महापालिका आयुक्तांना आहेत. कलम १५२ (क) नुसार मनपा आयुक्तांनी स्वत: सुनावणी घेऊन आक्षेप निकाली काढणे आवश्यक होते. याठिकाणी मनपा आयुक्तांनी अधिनस्थ अधिकाºयांना सुनावणीचे अधिकार दिले. अर्थात, नियमानुसार नागरिकांच्या आक्षेपांवर सुनावणी घेतली गेली नसल्याचे दिसून येते. मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी प्रशासनाने रितसर निविदा प्रक्रिया न राबवता स्थापत्य कन्सलटन्सीला काम दिले. प्रशासनाच्या व्यतिरिक्त नागरिकांच्या घरात जाऊन मालमत्तांचे मोजमाप घेण्याचा अधिकार खासगी कंपनीला नसल्याची माहिती अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिली. विभागीय आयुक्तांचा अभिप्राय ध्यानात घेता यासंदर्भातील पुढील सुनावणी मुख्यमंत्र्यांकडे घेतली जाणार आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे वेळ मागू,असे अ‍ॅड.आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार बळीराम सिरस्कार, उपाध्यक्ष जमिर उल्लाखान पठाण, बालमुकूंद भिरड, मनपा गटनेत्या अ‍ॅड.धनश्री देव, नगरसेवक बबलू जगताप, किरण बोराखडे, काशीराम साबळे, प्रसन्नजित गवई, गजानन गवई,शहर प्रमुख बुध्दरत्न इंगोले,अरूंधती शिरसाट, पराग गवई आदी उपस्थित होते.

संविधानाच्या संवर्धनाची गरज!काही राजकीय पक्षांकडून संविधान बचाव रॅली व संविधान पूजन केले जात आहे. हे सर्व फसवे प्रकार असल्याचे अँड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. संविधानाला धोका नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगत संविधानाच्या संवर्धनाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. 

शेतकर्‍यांनीच लुटीचं धोरण स्वीकारलं!प्रकल्पबाधित शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूच्या निमित्ताने भाजप असो वा काँग्रेस यांना शेतकर्‍यांशी काहीही घेणे-देणे नसल्याची  टीका अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी जातीच्या पुढार्‍यांनाच अवाजवी महत्त्व दिल्याचं सांगत खुल्या अर्थव्यवस्थेला शेतकर्‍यांचं सर्मथन होतं. या लुटीच्या अर्थव्यवस्थेचा हा बळी असून, त्याला कोणीही दोषी नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका