शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

रिलायन्स जिओ कंपनीविरोधात महापालिकेची पोलीस तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 17:19 IST

मनपा प्रशासनाने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या परवानगीशिवाय शहरात फोर-जी केबलसाठी खोदकाम केल्या जात असल्याच्या ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत उशिरा का होईना, मनपा प्रशासनाने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. कंपनीच्या खोदकामात रस्त्याचे नुकसान झाल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.शहरवासीयांना फोर-जी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सबबीखाली विविध मोबाइल कंपन्यांनी मनमानीरीत्या जागा दिसेल त्या ठिकाणी खोदकाम करण्याचा सपाटा लावला आहे. शहरात केबलचे जाळे टाकण्यासाठी मनपाच्या परवानगीला ठेंगा दाखविण्यात आल्याचे चित्र आहे. खोदकामाची परवानगी मागितल्यास कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे शुल्क जमा करावे लागते. सदर शुल्क जमा न करताच मनपाच्या बांधकाम विभागातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा सर्व खेळ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. गत दोन वर्षांत काही मोबाइल कंपन्यांनी विविध भागात सुमारे ४० किलोमीटर अंतरापेक्षा जास्त केबलचे जाळे टाकल्याची माहिती आहे. या बदल्यात मनपा प्रशासनाला किमान ३० कोटी रुपयांचा आर्थिक चुना लावण्यात आल्याचे दिसून येते. दिवस-रात्र खोदकाम करून रस्त्यालगत केबल टाकणाºया कंपन्यांना साधी विचारपूस न करणाºया बांधकाम विभागातील जबाबदार अधिकारी, उपअभियंता व कनिष्ठ अभियंते यांची प्रामाणिकता चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणाचा गवगवा होऊन सदर प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून बांधकाम विभागाने २३ डिसेंबर रोजी मनपाच्या परवानगीशिवाय खोदकाम करणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. मानसेवी उपअभियंता कृष्णा वाडेकर यांनी सदर तक्रार दिली आहे.महापौरांनी दिले शुल्क वसुलीचे निर्देश महापौर अर्चना मसने यांनी फोर-जी केबलसाठी खोदकाम करणाºया स्टरलाइट टेक कंपनीकडून ‘रिस्टोरेशन चार्ज’ वसूल करण्याचे निर्देश सोमवारी मनपा आयुक्तांना जारी केले आहेत. महापौरांच्या निर्देशावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.रिलायन्सला परवानगी कधी?मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीला २०१३ मध्ये १८ किलोमीटर अंतराचे फोर-जी केबल टाकण्यासाठी १२ कोटींच्या शुल्काची आकारणी केली होती. २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी कंपनीला आकारलेल्या दंडाची सुमारे तीन कोटींची रक्कम माफ करीत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर कंपनीने १८ किलोमीटर अंतराचे काम आटोपले. २०१८ मध्ये खडकी भागात रिलायन्स कंपनीच्या खोदकामात मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे सदर खोदकामासाठी मनपाने रिलायन्सला कधी परवानगी दिली, असा सवाल उपस्थित होऊन खुद्द प्रशासन संशयाच्या घेºयात सापडले आहे.

म्हणे खड्डे खोदले; केबल टाकलेच नाही!मनपाला ३० कोटींचा चुना लावणाºया विविध मोबाइल कंपन्यांनी खोदकामाचा सपाटा लावल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोर-जीसाठी ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. त्यावेळी काही कंपन्यांनी केवळ खड्डे खोदले, त्यामध्ये केबल टाकलेच नाही, अशी मखलाशी जोडली जात आहे. या प्रकारामुळे कंपन्यांसह प्रशासन व सत्ताधारी भाजपची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाReliance Jioरिलायन्स जिओ