शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

अकोला महापालिकेची कचरा विलगीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:49 PM

अकोला : स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाºया स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेकडे ...

अकोला: स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाºया स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेकडे महापालिकेने पाठ फिरविल्याची परिस्थिती आहे. घनकचºयाच्या मुद्यावर शासनाच्या भूमिकेत वेळोवेळी बदल होत असल्याने मनपा प्रशासन संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. यात भरीस भर मनपाचे घंटागाडी चालक शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकून पसार होत आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित असताना आरोग्य निरीक्षकांनी झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१५ ते २०१७ या कालावधीत महापालिके च्या स्तरावर नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक स्तरावर शौचालय बांधून देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. कचºयाचे विलगीकरण न केल्यास महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. शासनाचा ‘अल्टीमेटम’ कधीचाच संपुष्टात आला असला, तरी अद्यापही स्वायत्त संस्थांचे अनुदान बंद करण्यात आले नाही, हे येथे उल्लेखनीय. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने कचरा विलगीकरणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.मुख्य रस्त्यांलगत कचरा!कचरा उचलण्यासाठी महापालिकेने स्वत:च्या मालकीचे १६ आणि भाडेतत्त्वावर ३३ ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे. नागरिकांच्या घरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ घंटागाड्यांची व्यवस्था आहे. कचºयाच्या मुद्यावर एवढा लवाजमा असताना मुख्य रस्त्यांलगत कचरा साचल्याचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळते. इंधनावर होणारा खर्च वाचवून स्वत:चे खिसे जड करण्याच्या प्रकारातून काही घंटागाडी चालक प्रभागातील खुल्या जागा, ओसाड जागेवर कचरा टाकून मोकळे होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गालगतचा निमवाडी परिसर, ढोर बाजार, बाळापूर रोडवरील जुना जकात नाका परिसर, प्रभाग क्रमांक आठमधील अन्नपूर्णा माता मंदिरामागील परिसराचा समावेश आहे.

५०० टनची अट कायमच!कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातून किमान दैनंदिन ५०० मेट्रिक टन कचºयाची अट केंद्र शासनाने घातली आहे. लहान शहरांना केंद्राचे अनुदान मिळणार नसल्यामुळे दैनंदिन ५०० टन कचºयाची अट शिथिल करून त्याऐवजी २०० टन कचºयाचा समावेश करण्याची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लावून धरली आहे. यासंदर्भात आजपर्यंतही केंद्र व राज्य शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे घनकचºयाच्या मुद्यावर महापालिकेची कोंडी होत असल्याचे दिसत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका