शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पाणीपुरवठ्यामुळे अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:16 IST

अकोला एमआयडीसीतील उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने  शेकडो उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.  येत्या जानेवारीपासून अधिक बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागविण्यासाठी आता तरी एमआयडीसी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ओरड उद्योजकांकडून होत आहे.

ठळक मुद्देविधिमंडळ विशेष कुंभारी तलावाचा ताबा आणि स्वतंत्र्य पाणी पुरवठा पाइपलाइनची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला एमआयडीसीतील उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने  शेकडो उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.  येत्या जानेवारीपासून अधिक बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागविण्यासाठी आता तरी एमआयडीसी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ओरड उद्योजकांकडून होत आहे. कुंभारी तलावाचा ताबा आणि महान धरणापासून स्वतंत्र पाणी पुरवठा पाइपलाइन टाकण्याचे दोन महत्त्वपूर्ण प्रस्ताव अकोल्यातून पाठविले जात आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या महत्त्वाकांक्षी प्रक ल्पांना मंजुरी मिळते काय, याकडे अकोल्यातील उद्योजकांचे लक्ष लागून आहे.  नागपूरनंतर अकोला एमआयडीसीचा उद्योग विदर्भात सर्वात मोठा आहे. डाळ, तेल, बेसन आणि गोल्डफिंगरच्या अकोल्यातील उद्योजकांनी आपली वेगळी छाप उमटविली आहे. विदर्भात क्रमांक दोनचा उद्योग अकोल्यात असतानाही एमआयडीसीचे विभागीय कार्यालय येथे नाही. पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना येथे नाही. दर दोन वर्षांनंतर पाणी समस्येमुळे अकोला एमआयडीसीतील पाणी टंचाईमुळे येथील उद्योजकांची गैरसोय होते. यंदाही पाणी समस्येमुळे अकोल्यातील शेकडो उद्योग अडचणीत सापडले आहेत. उद्योगांची तहान भागविण्यास एमआयडीसी प्रशासन सक्षम नाही. खांबोराहून होणारा पाणी पुरवठा बंद झाल्यापासून कुंभारी धरणातून उद्योगांना पाणी दिले जात आहे. तीन दिवसाआड केवळ एक तास पाणी दिले जात आहे. डिसेंबरनंतर बोअर करणे आणि विहीर अधिग्रहणाचे प्रयोग सुरू होणार आहेत.कधीकाळी मलकापूर ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेला कुंभारीचा तलाव आता एमआयडीसीने ताब्यात घेण्याचा प्रयोग सुरू केला आहे. तसेच मजीप्राने स्वतंत्र पाइपलाइन बसविण्यासाठी १९ कोटींचा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठविला आहे. अधिवेशनाच्या तोंडावर या  दोन्ही प्रस्तावांवर गंभीरतेने विचार झाला, तर अकोल्यातील उद्योगांना संजीवनी देऊन जगविण्याचे बळ मिळेल, अशी अपेक्षा अकोल्यातील शेकडो उद्योजकांना लागली आहे.

एमआयडीसीतील पाणी टंचाईची समस्या गत अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. अकोल्यातील उद्योजक गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याचे अनेक उपाय सूचवित आहेत. मात्र त्याकडे कुणी लक्ष देत नाही. यंदाही नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. त्याची दखल अधिकारी किती घेतात, याकडे आमचे लक्ष लागले आहे.-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशन.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळWaterपाणी