शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अल्प पाणीपुरवठ्यामुळे अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:16 IST

अकोला एमआयडीसीतील उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने  शेकडो उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.  येत्या जानेवारीपासून अधिक बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागविण्यासाठी आता तरी एमआयडीसी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ओरड उद्योजकांकडून होत आहे.

ठळक मुद्देविधिमंडळ विशेष कुंभारी तलावाचा ताबा आणि स्वतंत्र्य पाणी पुरवठा पाइपलाइनची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला एमआयडीसीतील उद्योगांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने  शेकडो उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.  येत्या जानेवारीपासून अधिक बिकट स्थिती निर्माण होणार आहे. अकोला एमआयडीसीतील उद्योगांची तहान भागविण्यासाठी आता तरी एमआयडीसी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी ओरड उद्योजकांकडून होत आहे. कुंभारी तलावाचा ताबा आणि महान धरणापासून स्वतंत्र पाणी पुरवठा पाइपलाइन टाकण्याचे दोन महत्त्वपूर्ण प्रस्ताव अकोल्यातून पाठविले जात आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या महत्त्वाकांक्षी प्रक ल्पांना मंजुरी मिळते काय, याकडे अकोल्यातील उद्योजकांचे लक्ष लागून आहे.  नागपूरनंतर अकोला एमआयडीसीचा उद्योग विदर्भात सर्वात मोठा आहे. डाळ, तेल, बेसन आणि गोल्डफिंगरच्या अकोल्यातील उद्योजकांनी आपली वेगळी छाप उमटविली आहे. विदर्भात क्रमांक दोनचा उद्योग अकोल्यात असतानाही एमआयडीसीचे विभागीय कार्यालय येथे नाही. पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना येथे नाही. दर दोन वर्षांनंतर पाणी समस्येमुळे अकोला एमआयडीसीतील पाणी टंचाईमुळे येथील उद्योजकांची गैरसोय होते. यंदाही पाणी समस्येमुळे अकोल्यातील शेकडो उद्योग अडचणीत सापडले आहेत. उद्योगांची तहान भागविण्यास एमआयडीसी प्रशासन सक्षम नाही. खांबोराहून होणारा पाणी पुरवठा बंद झाल्यापासून कुंभारी धरणातून उद्योगांना पाणी दिले जात आहे. तीन दिवसाआड केवळ एक तास पाणी दिले जात आहे. डिसेंबरनंतर बोअर करणे आणि विहीर अधिग्रहणाचे प्रयोग सुरू होणार आहेत.कधीकाळी मलकापूर ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेला कुंभारीचा तलाव आता एमआयडीसीने ताब्यात घेण्याचा प्रयोग सुरू केला आहे. तसेच मजीप्राने स्वतंत्र पाइपलाइन बसविण्यासाठी १९ कोटींचा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठविला आहे. अधिवेशनाच्या तोंडावर या  दोन्ही प्रस्तावांवर गंभीरतेने विचार झाला, तर अकोल्यातील उद्योगांना संजीवनी देऊन जगविण्याचे बळ मिळेल, अशी अपेक्षा अकोल्यातील शेकडो उद्योजकांना लागली आहे.

एमआयडीसीतील पाणी टंचाईची समस्या गत अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. अकोल्यातील उद्योजक गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्याचे अनेक उपाय सूचवित आहेत. मात्र त्याकडे कुणी लक्ष देत नाही. यंदाही नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. त्याची दखल अधिकारी किती घेतात, याकडे आमचे लक्ष लागले आहे.-कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशन.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळWaterपाणी