शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-खंडवा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातूनच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 10:37 IST

राज्य सरकारने यासाठी सुचविलेल्या पर्यायी मार्गाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत अनेक वर्षांपासून रखडलेला अकोला-खंडवा गेज परिवर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातूनच जाऊ द्यावा, असे केंद्र सरकारला वाटत असून, राज्य सरकारने यासाठी सुचविलेल्या पर्यायी मार्गाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याची माहिती आहे.रखडलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्याच्या उद्देशाने मंगळवार, ७ जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली. या बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचा मुद्दाही चर्चिल्या गेल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने २५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव परत पाठवून यावर सूचना मागविल्या होत्या; परंतु राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नसल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी मंत्र्यांना सांगितले. यावर तिन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत उपस्थित असलेल्या वन विभागाच्या अधिकाºयांनी केंद्रीय मंत्र्यांच्या नाराजीबाबत महाराष्ट्र सरकारला कळविले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा असलेला अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम सुरू आहे. अकोला ते अकोट- ४३ किमी, अकोट ते अमला खुर्द - ७७ किमी, अमला खुर्द ते खंडवा- ५४ किमी अशा तीन टप्प्यांमध्ये हे काम होत आहे. अकोला - अकोट दरम्यानचे काम पूर्णत्वास आले आहे; परंतु अकोट ते आमला खुर्द हा ३५ किलो मीटरचा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी १८ किलो मीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्यामुळे या भागातून गेज परिवर्तनाला पर्यावरणवादी व विविध संस्थांकडून विरोध होत असून, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. जैवविविधतेचा ºहास होऊ नये म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाहेरून रेल्वे मार्ग न्यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.व्याघ्र प्रकल्पाबाहेरून नेल्यास या प्रकल्पाची लांबी २९ किलो मीटरने वाढणार असून, भूसंपादन व इतर खर्च धरल्यास या प्रकल्पाची किंमतही वाढणार आहे. बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही मार्च महिन्यात अकोला-खांडवा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नेण्यास विरोध करत पर्यायी मार्गाचा विचार व्हावा,असे मत व्यक्त केले होते.

 

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पrailwayरेल्वेAkolaअकोला