शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

अकोला-खंडवा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातूनच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 10:37 IST

राज्य सरकारने यासाठी सुचविलेल्या पर्यायी मार्गाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत अनेक वर्षांपासून रखडलेला अकोला-खंडवा गेज परिवर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातूनच जाऊ द्यावा, असे केंद्र सरकारला वाटत असून, राज्य सरकारने यासाठी सुचविलेल्या पर्यायी मार्गाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याची माहिती आहे.रखडलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्याच्या उद्देशाने मंगळवार, ७ जुलै रोजी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली. या बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचा मुद्दाही चर्चिल्या गेल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने २५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव परत पाठवून यावर सूचना मागविल्या होत्या; परंतु राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नसल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी मंत्र्यांना सांगितले. यावर तिन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत उपस्थित असलेल्या वन विभागाच्या अधिकाºयांनी केंद्रीय मंत्र्यांच्या नाराजीबाबत महाराष्ट्र सरकारला कळविले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा असलेला अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम सुरू आहे. अकोला ते अकोट- ४३ किमी, अकोट ते अमला खुर्द - ७७ किमी, अमला खुर्द ते खंडवा- ५४ किमी अशा तीन टप्प्यांमध्ये हे काम होत आहे. अकोला - अकोट दरम्यानचे काम पूर्णत्वास आले आहे; परंतु अकोट ते आमला खुर्द हा ३५ किलो मीटरचा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी १८ किलो मीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्यामुळे या भागातून गेज परिवर्तनाला पर्यावरणवादी व विविध संस्थांकडून विरोध होत असून, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. जैवविविधतेचा ºहास होऊ नये म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबाहेरून रेल्वे मार्ग न्यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.व्याघ्र प्रकल्पाबाहेरून नेल्यास या प्रकल्पाची लांबी २९ किलो मीटरने वाढणार असून, भूसंपादन व इतर खर्च धरल्यास या प्रकल्पाची किंमतही वाढणार आहे. बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनीही मार्च महिन्यात अकोला-खांडवा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नेण्यास विरोध करत पर्यायी मार्गाचा विचार व्हावा,असे मत व्यक्त केले होते.

 

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पrailwayरेल्वेAkolaअकोला