शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

अकोला-खंडवा ब्रॉडगेज मार्ग राजकीय ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 10:28 IST

सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असतानाच आता या मुद्याचे राजकीयकरण होत असल्याचे दिसत आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत थांबायला तयार नाही. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाला पर्याय शोधावा, असे समोर आल्यावर हा मार्ग बुलडाण्यातून नेण्यासाठी राजकीय आंदोलन उभे राहिले दुसरीकडे या मार्गावरील अकोटपर्यंतचा टप्पा पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यायी मार्गाची पाठराखण केल्याने हा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असतानाच आता या मुद्याचे राजकीयकरण होत असल्याचे दिसत आहे.अकोला ते खंडवा या एकूण १७६ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा ३८ किलोमीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किलोमीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने पर्यावरणप्रेमींचा या मार्गाला विरोध होत आहे. मेळघाटमधून जाणारा प्रस्तावित मार्ग हा पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम असून, त्याऐवजी पर्यायी मार्ग व्यापक लोकहिताचा असल्याचा रेटा राज्य शासनाकडे सुरू असून, न्यायालयातही याचिका दाखल आहेत. याच सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यवर्ती समितीकडे सध्या प्रकरण सोपविलेले आहे. या पृष्ठभूमीवर १५ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्र लिहून अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर पर्यावरणवाद्यांसह बुलडाणा जिल्हा वासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या मागणीचा मिळेल त्या व्यासपीठावरून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे तर दुसरीकडे तेल्हारा तालुक्यातूनही हा रेल्वेमार्ग अकोला, हिवरखेड, तेल्हारा येथून पुढे संग्रामपूर, जळगाव जामोद येथून खंडवा येथे नेण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. तिकडे मेळघाटातही या मुद्यावर राजकारण तापले आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांकरिता ही रेल्वे महत्त्वाची असून, हा मार्ग पूर्ववत ठेवावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. या मागणीसाठी भाजपाने पुढाकार घेतला असून, स्वातंत्र्यदिनी मेळघाटातील गावांमध्ये ग्रामपंचयातीने या मार्गासाठी ठराव केले आहेत.

भाजपाविरुद्धशिवसेना असा रंग येणार!अकोला ते खंडवा हा बहुप्रतीक्षित मार्ग पूर्ण व्हावा यासाठी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सातत्याने पुढाकार घेतला. या मार्गावर धावलेल्या अखेरच्या रेल्वेमध्ये प्रवास करून त्यांनी त्यांच्यासाठी हा मार्ग किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित केले होते. सध्या पर्यावरणाच्या मुद्यावर एकीकडे न्यायालयात याचिका दाखल असताना राजकीय वातावरणही तापले आहे. या पृष्ठभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाने आहे तोच मार्ग ही भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे, तर बुलडाण्यात सेनेचे खासदार असल्याने ते पर्याय मार्गाचे समर्थक आहेत, त्यामुळे या मुद्दाला भाजपा विरुद्ध शिवसेना असा रंग येण्याची चिन्हे आहेत.

 

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणAkolaअकोलाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा