शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अकोला : घरकुल लाभार्थी निवड प्रक्रियेत तीन महिने आधीच मय्यत दाखवून केले अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:02 IST

अकोला : तालुक्यातील सांगळूद गावातील विठ्ठल शिवाजी मंडासे हयात असताना त्यांचे नाव पात्र यादीतून मय्यत म्हणून कमी करण्यात आले, १५ ऑगस्ट रोजी झालेल्या निवड सभेनंतर तीन महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे, जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून त्याला अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखा आहे. 

ठळक मुद्देसांगळूद येथील घरकुल लाभार्थी निवड सभेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तालुक्यातील सांगळूद येथे रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी निवड प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाल्याचे प्रकार पुढे येत आहेत. गावातील विठ्ठल शिवाजी मंडासे हयात असताना त्यांचे नाव पात्र यादीतून मय्यत म्हणून कमी करण्यात आले, १५ ऑगस्ट रोजी झालेल्या निवड सभेनंतर तीन महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे, जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून त्याला अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखा आहे. सांगळूद ग्रामपंचायतीमध्ये घरकुल लाभार्थी निवड यादीत मोठय़ा प्रमाणात अपात्र लाभार्थी घुसडण्यासाठी पात्र लाभार्थींना वगळण्यात आले आहे. त्यातून गरजवंत कुटुंबाला घरकुलापासून वंचित ठेवण्यात आले. हा प्रकार एकाच कुंटुंबातील तिघांना घरकुलाचा लाभ दिल्यानंतर उघड होत आहे. ७ फेब्रुवारी २0१७ रोजी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र-अपात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध झाली. त्या अपात्र यादीमध्ये विठ्ठल शिवाजी मंडासे यांचे नाव १८४ क्रमांकावर नमूद होते. त्यापुढे मय्यत असा शेरा लिहिण्यात आला. विशेष म्हणजे, लाभार्थी निवडीची सभा १५ ऑगस्ट २0१६ रोजी झाली होती. त्यावेळी निवड झाल्यानंतर पात्र-अपात्र निवड करण्यात आली. ती यादी तयार झाल्यानंतर २६ नोव्हेंबर २0१६ रोजी मंडासे यांचे निधन झाले. निवड सभेच्या तारखेनंतर तीन महिन्यापर्यंत ते जिवंत होते. सभेत निवड करतानाच त्यांच्या नावापुढे मय्यत शेरा कसा लिहिण्यात आला. त्यामुळे अपात्र कसे ठरवले, याची तक्रार कलावंताबाई मंडासे यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे. सोबतच कच्चे घर असलेल्यांमध्ये रुख्माबाई घावट, रमेश जाधव यांचे पक्के घर असल्याचे दाखवून अपात्र करण्यात आले. सर्वात गंभीर बाब म्हणजे, ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच राहणारे बी.के. कुकडकर बाहेरगावी असल्याचे दाखवून त्यांनाही अपात्र करण्यात आले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लाभार्थींना अपात्र ठरवून त्यांच्याऐवजी इतर अपात्र असलेल्यांना लाभ दिल्याच्या तक्रारी गटविकास अधिकार्‍यांकडे करण्यात आल्या. त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आता ग्रामसेवक, सरपंचावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणzpजिल्हा परिषद