शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वान धरणातून अकोल्याला मिळणार ९.५ दलघमी पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:33 IST

अकोला शहराची लाइफलाइन काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून वान धरणातील ९.५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी दालनात झालेल्या पाणी आरक्षण सभेत पालकमंत्री, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ठळक मुद्देहिवाळी, उन्हाळी पिकांना पाणी नाहीवान प्रकल्पांतर्गत केवळ हरभरा पिकाला मिळणार पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहराची लाइफलाइन काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून वान धरणातील ९.५ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी दालनात झालेल्या पाणी आरक्षण सभेत पालकमंत्री, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धरणात पूरक जलसाठा उपलब्ध नसल्याने हिवाळी, उन्हाळी पिकांना पाणी मिळणार नाही; पण वान धरणाच्या कक्षेत असलेल्या ३00 ते ४00 हेक्टरवरील हरभरा पिकाला ६.५ दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.यावर्षी पाऊस कमी झाल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात दुष्काळी स्थिती आहे. धरणातही जेमतेम जलसाठा शिल्लक असल्याने या पाण्याचे काटेकोर नियोजन व आरक्षण ठरविण्यासाठी या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात २0१७-१८ मधील पाणी आरक्षणावर सभा घेण्यात आली. सभेला पालकमंत्री  तथा जिल्हा पाणी आरक्षण सतिीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.काटेपूर्णा धरणात आजमितीस १९.५६ टक्के जलसाठा शिल्लक असून, त्यामध्ये ६.५0 दलघमी गाळ तर दरवर्षीप्रमाणे ४.६0 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असते. म्हणजेच काटेपूर्णा धरणातील ८.५६ टक्केच जलसाठा अकोलेकरांसाठी उपलब्ध आहे. तसेच ४ दलघमी मृत साठा उचलण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.  अकोला शहराची पाण्याची वार्षिक गरज मात्र २0 दशलक्ष घनमीटर आहे. याच अनुषंगाने वान धरणातील पाण्याचे आरक्षण करण्यात आले. वान धरणातूनच अकोट, तेल्हारा, शेगाव, जळगाव जामोद १८0 खेडी तसेच ८४ खेडी पाणी पुरवठा योजनेला पाणी सोडण्यात येते; पण काटेपूर्णा धरणात पाणी नसल्याने यावर्षी काटेपूर्णा धरणाच्या कक्षेतील खारपाणपट्टय़ातील ६४ खेडी पाणी पुरवठा योजनेला वानमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

औद्योगिक वसाहतीला कुंभारी तलावाचे पाणी अकोला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत उद्योगासाठी 0.७३ दलघमी पाण्याची मागणी करण्यात आली आहे. तथापि, काटेपूर्णा धरणात पाणी नसल्याने पाणी देण्यात येणार नाही. एमआयडीसीतर्फे धरणातून थेट पाणी उचलत असेल, तरच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला, अन्यथा कुंभारी लघू प्रकल्पातील पाणीसाठा वापरण्यात यावा, असे आदेश सभेत देण्यात आले.

हरभरा पिकाकरिता ६.५0 दलघमी पाणीवान धरणातून यावर्षी रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी सोडले जाणार नाही; पण सध्या उभ्या असलेल्या ३00 ते ४00 हेक्टरवरील हरभरा पिकाची स्थिती बघता दोन पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी ६.५0 दलघमी पाणी सोडण्याचे आदेश या सभेत देण्यात आले. दरम्यान, लघू प्रकल्पांमध्ये ९.९0 दलघमी पाणी आहे; पण तेथे कोणतीही पाणी पुरवठा योजना नाही, त्यामुळे उपसाद्वारे सिंचन करण्यास हरकत नसल्याचे सभेत ठरले.

पारस औष्णिक प्रकल्पाला मिळणार निगरुणातून पाणीपारस औष्णिक वीज कें द्रासाठी मन नदीतून पाणी घेतले जाते. तथापि, पारस बॅरेजमध्ये पाणी कमी असल्याने २0१७-१८ करिता १८.00 दलघमी पाण्याची मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने यावर्षी निगरुणा मध्यम प्रकल्पातील १२.४८ दलघमी पाणी व पारस बॅरेजमधील ४.00 दलघमी असे एकूण १६.४८ दलघमी पारस औष्णिक केंद्राला देण्यात येईल, तसेच श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावकरिता १.00 दलघमी पाणी राखीव ठेवण्यात यावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

घुंगशी धरणातील पाण्याबाबत पालकमंत्र्यांच्या सूचना घुंगशी बॅरेजमधील पाणी टप्प्या-टप्प्याने सोडून पूर्णा नदीवरील म्हैसांग व इतर कोल्हापुरी बंधार्‍यांमध्ये फळ्या टाकून पाणी अडविण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिल्या. 

मूर्तिजापूरला घुंगशी बॅरेजमधून पाणी!मूर्तिजापूर शहरासाठी काटेपूर्णा धरणातून २.८३२ दलघमी पाण्याची मागणी करण्यात आली. तथापि, यावर्षी घुंगशी बॅरेज 0.२८४ दलघमी पाणी उचलण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

धरणांमध्ये पूरक जलसाठा उपलब्ध नसल्याने रब्बी व येणार्‍या उन्हाळी पिकांना पाणी मिळणार नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी गहू पिकांची पेरणी करणे टाळावे व पाण्याचे काटेकोर नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.- जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.- 

टॅग्स :DamधरणWaterपाणी