शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अकोला जिल्ह्यात उन्हाळी पिकांचा पेरा घटणार; पाणी न सोडण्याचा पाटबंधारे विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 15:22 IST

अकोला : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांतील पाणी साठा कमी असल्याने वाण धरणाच्या पाण्यावर सर्व भिस्त असल्याने या धरणातील पाणी सुरक्षित ठेवले जाणार असल्याचे वृत्त आहे. बहुतांश ठिकाणी विहिरी व कूपनलिकांची पातळी घटली असून, उन्हाळी पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अकोला : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे. त्यामुळे उन्हाळी पाणी न सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलेला असल्याने यावर्षी उन्हाळी भुईमूग व इतर उन्हाळी पिकांचा पेरा घटणार आहे.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हा मोठा सिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पांतर्गत आठ हजारांवर हेक्टरवरील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडले जाते. तथापि यावर्षी आजमितीस या प्रकल्पात केवळ ९.४० दशलक्ष घनमीटरच जलसाठा शिल्लक असल्याने रब्बी पिकांनाच पाणी सोडले नाही. त्यामुळे उन्हाळी पिकानांही पाणी मिळणार नसल्याने या धरणाच्या क्षेत्रातील पेरा कमी होणार आहे. पातूर तालुक्यात मोर्णा व निर्गृणा हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. मोर्णा प्रकल्पात आजमितीस ५.५० दशलक्ष घनमीटर म्हणजेच १३.२७ जलसाठा शिल्लक आहे. यात गाळाचे प्रमाण भरपूर असल्याने या प्रकल्पातील पाणी उन्हाळा पिकांना सोडणार का, असा प्रश्न शेतकºयांकडून विाचारला जात आहे. निर्गृणा प्रकल्पात ८.९२ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाची जलपातळी ०.५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ०.४३ टक्के एवढीच आहे. शून्य टक्क्याकडे वाटचाल करणाºया या धरणात यावर्षी उन्हाळी पिकांसाठी पाणीच नाही. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा धरणात, तर पावसाचे पाणी साठलेच नाही. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात मात्र बºयापैकी ८०.३४ टक्के जलसाठा आहे. पण, याही धरणातील पाणी रब्बीसाठीच मोजून देण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांतील पाणी साठा कमी असल्याने वाण धरणाच्या पाण्यावर सर्व भिस्त असल्याने या धरणातील पाणी सुरक्षित ठेवले जाणार असल्याचे वृत्त आहे.जिल्ह्यातील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने धरणाच्या क्षेत्रातील उन्हाळी पिकांचे क्षेत्र कमी होणार आहे. पण, ज्या शेतकºयांकडे विहिरी आहेत. त्यामध्ये बºयापैकी पाणी असल्यास तेथील शेतकरी उन्हाळी पिके घेतील. पण, बहुतांश ठिकाणी विहिरी व कूपनलिकांची पातळी घटली असून, उन्हाळी पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच फळपिकांवरही यावर्षी पाण्याअभावी परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीagricultureशेती