शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोला जिल्ह्यात उन्हाळी पिकांचा पेरा घटणार; पाणी न सोडण्याचा पाटबंधारे विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 15:22 IST

अकोला : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांतील पाणी साठा कमी असल्याने वाण धरणाच्या पाण्यावर सर्व भिस्त असल्याने या धरणातील पाणी सुरक्षित ठेवले जाणार असल्याचे वृत्त आहे. बहुतांश ठिकाणी विहिरी व कूपनलिकांची पातळी घटली असून, उन्हाळी पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अकोला : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे. त्यामुळे उन्हाळी पाणी न सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलेला असल्याने यावर्षी उन्हाळी भुईमूग व इतर उन्हाळी पिकांचा पेरा घटणार आहे.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हा मोठा सिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पांतर्गत आठ हजारांवर हेक्टरवरील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडले जाते. तथापि यावर्षी आजमितीस या प्रकल्पात केवळ ९.४० दशलक्ष घनमीटरच जलसाठा शिल्लक असल्याने रब्बी पिकांनाच पाणी सोडले नाही. त्यामुळे उन्हाळी पिकानांही पाणी मिळणार नसल्याने या धरणाच्या क्षेत्रातील पेरा कमी होणार आहे. पातूर तालुक्यात मोर्णा व निर्गृणा हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. मोर्णा प्रकल्पात आजमितीस ५.५० दशलक्ष घनमीटर म्हणजेच १३.२७ जलसाठा शिल्लक आहे. यात गाळाचे प्रमाण भरपूर असल्याने या प्रकल्पातील पाणी उन्हाळा पिकांना सोडणार का, असा प्रश्न शेतकºयांकडून विाचारला जात आहे. निर्गृणा प्रकल्पात ८.९२ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाची जलपातळी ०.५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ०.४३ टक्के एवढीच आहे. शून्य टक्क्याकडे वाटचाल करणाºया या धरणात यावर्षी उन्हाळी पिकांसाठी पाणीच नाही. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा धरणात, तर पावसाचे पाणी साठलेच नाही. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात मात्र बºयापैकी ८०.३४ टक्के जलसाठा आहे. पण, याही धरणातील पाणी रब्बीसाठीच मोजून देण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांतील पाणी साठा कमी असल्याने वाण धरणाच्या पाण्यावर सर्व भिस्त असल्याने या धरणातील पाणी सुरक्षित ठेवले जाणार असल्याचे वृत्त आहे.जिल्ह्यातील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने धरणाच्या क्षेत्रातील उन्हाळी पिकांचे क्षेत्र कमी होणार आहे. पण, ज्या शेतकºयांकडे विहिरी आहेत. त्यामध्ये बºयापैकी पाणी असल्यास तेथील शेतकरी उन्हाळी पिके घेतील. पण, बहुतांश ठिकाणी विहिरी व कूपनलिकांची पातळी घटली असून, उन्हाळी पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच फळपिकांवरही यावर्षी पाण्याअभावी परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीagricultureशेती