शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अकोला जिल्ह्यात उन्हाळी पिकांचा पेरा घटणार; पाणी न सोडण्याचा पाटबंधारे विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 15:22 IST

अकोला : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांतील पाणी साठा कमी असल्याने वाण धरणाच्या पाण्यावर सर्व भिस्त असल्याने या धरणातील पाणी सुरक्षित ठेवले जाणार असल्याचे वृत्त आहे. बहुतांश ठिकाणी विहिरी व कूपनलिकांची पातळी घटली असून, उन्हाळी पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अकोला : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह मध्यम धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, उमा धरणाची पाणी पातळी शून्य टक्क्यावर आली आहे. त्यामुळे उन्हाळी पाणी न सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलेला असल्याने यावर्षी उन्हाळी भुईमूग व इतर उन्हाळी पिकांचा पेरा घटणार आहे.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हा मोठा सिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पांतर्गत आठ हजारांवर हेक्टरवरील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडले जाते. तथापि यावर्षी आजमितीस या प्रकल्पात केवळ ९.४० दशलक्ष घनमीटरच जलसाठा शिल्लक असल्याने रब्बी पिकांनाच पाणी सोडले नाही. त्यामुळे उन्हाळी पिकानांही पाणी मिळणार नसल्याने या धरणाच्या क्षेत्रातील पेरा कमी होणार आहे. पातूर तालुक्यात मोर्णा व निर्गृणा हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. मोर्णा प्रकल्पात आजमितीस ५.५० दशलक्ष घनमीटर म्हणजेच १३.२७ जलसाठा शिल्लक आहे. यात गाळाचे प्रमाण भरपूर असल्याने या प्रकल्पातील पाणी उन्हाळा पिकांना सोडणार का, असा प्रश्न शेतकºयांकडून विाचारला जात आहे. निर्गृणा प्रकल्पात ८.९२ दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाची जलपातळी ०.५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ०.४३ टक्के एवढीच आहे. शून्य टक्क्याकडे वाटचाल करणाºया या धरणात यावर्षी उन्हाळी पिकांसाठी पाणीच नाही. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा धरणात, तर पावसाचे पाणी साठलेच नाही. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात मात्र बºयापैकी ८०.३४ टक्के जलसाठा आहे. पण, याही धरणातील पाणी रब्बीसाठीच मोजून देण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांतील पाणी साठा कमी असल्याने वाण धरणाच्या पाण्यावर सर्व भिस्त असल्याने या धरणातील पाणी सुरक्षित ठेवले जाणार असल्याचे वृत्त आहे.जिल्ह्यातील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने धरणाच्या क्षेत्रातील उन्हाळी पिकांचे क्षेत्र कमी होणार आहे. पण, ज्या शेतकºयांकडे विहिरी आहेत. त्यामध्ये बºयापैकी पाणी असल्यास तेथील शेतकरी उन्हाळी पिके घेतील. पण, बहुतांश ठिकाणी विहिरी व कूपनलिकांची पातळी घटली असून, उन्हाळी पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच फळपिकांवरही यावर्षी पाण्याअभावी परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीagricultureशेती