शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अकोला जिल्ह्यात २७ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:08 IST

जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २७ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.

अकोला : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २७ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. पाणीटंचाईग्रस्त या गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यात अद्याप सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. नदी-नाले कोरडेच असून, विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यातही ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त २७ गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!तालुका             गावे               टँकरअकोला              २                   २बार्शीटाकळी        ८                  ९अकोट                ३                    ३बाळापूर             ७                   ११पातूर                ६                     ६मूर्तिजापूर         १                    १.............................................एकूण             २७                     ३२जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा!पावसाळ्यातही जिल्ह्यातील विविध भागात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार आणि जिल्ह्यातील धरणे आणि जलसाठ्यांमध्ये पुरेसा जलसाठा केव्हा उपलब्ध होणार, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई