शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अकोला जिल्ह्यात २७ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:08 IST

जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २७ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.

अकोला : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाईग्रस्त २७ गावांतील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. पाणीटंचाईग्रस्त या गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यात अद्याप सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. नदी-नाले कोरडेच असून, विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या कायम आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यातही ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त २७ गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून, ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे.टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असलेली अशी आहेत गावे!तालुका             गावे               टँकरअकोला              २                   २बार्शीटाकळी        ८                  ९अकोट                ३                    ३बाळापूर             ७                   ११पातूर                ६                     ६मूर्तिजापूर         १                    १.............................................एकूण             २७                     ३२जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा!पावसाळ्यातही जिल्ह्यातील विविध भागात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस केव्हा बरसणार आणि जिल्ह्यातील धरणे आणि जलसाठ्यांमध्ये पुरेसा जलसाठा केव्हा उपलब्ध होणार, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र प्रतीक्षा केली जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई