शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

शाळा सिद्धी उपक्रमात अकोला जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:16 IST

स्वयंमूल्यांकन व बाह्यमूल्यांकनात शाळांमध्ये पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधांनुसार शाळांना ग्रेड दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : समग्र शिक्षण, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने शाळासिद्धी उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे स्वयंमूल्यांकन आणि बाह्यमूल्यांकनाचा अहवाल देण्यात अकोला जिल्हा प्रथम स्थानावर पोहोचला आहे. जिल्ह्यातील ७ टक्के काम अपूर्ण असून, ते येत्या दोन दिवसात पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. स्वयंमूल्यांकन व बाह्यमूल्यांकनात शाळांमध्ये पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधांनुसार शाळांना ग्रेड दिला जाणार आहे.शाळासिद्धी उपक्रमाची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांचे शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत स्वयंमूल्यांकन करणे व त्यापैकी किमान २० हजार शाळांना समृद्ध शाळा करण्याची उद्दिष्टे निश्चित केली होती. या मूल्यांकनात प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन शालेय अभिलेख तसेच पुरावे, भौतिक सोयी-सुविधा, शाळा व्यवस्थापन समिती, नव्या उपक्रमांची पाहणी केली जाते. त्यासाठी प्रशिक्षक निर्धारक गट तयार करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षित केलेले निर्धारक शाळांची श्रेणी अंतिम करणार असून, त्यानुसार त्या त्या गटात शाळांची विभागणी केली जाणार आहे. राज्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी आणि शालेय विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत शाळासिद्धी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेण्याच्या दृष्टिकोनातून १00 टक्के स्वयंमूल्यांकन शाळासिद्धी पोर्टलवर माहिती द्यावी लागते. त्या उपक्रमात सद्यस्थितीत अकोला जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.तर रत्नागिरी, हिंगोली,भंडारा, सांगली, वर्धा आणि सातारा जिल्हेही पहिल्या दहाच्या यादीत पोहोचले आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील १,८१६ शाळांपैकी १,६९२ शाळांचे स्वयंमूल्यमापन पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३,१८४ शाळांपैकी २,७४९ पूर्ण, हिंगोली जिल्ह्यातील १,२६९ पैकी ९६२ शाळा पूर्ण झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील उर्वरित शाळांनी येत्या दोन दिवसात काम पूर्ण करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा