शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाची कामे निम्म्यावरच ; केवळ ५४० कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 13:48 IST

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित कामे करता येणार नाहीत.

ठळक मुद्दे५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली.उर्वरित ५४४ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी आहेत.

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित कामे करता येणार नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची कामे निम्म्यावरच थांबल्याचे वास्तव समोर आले आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, अकोला  जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले कोरडी पडले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी १ जूनपर्यंत केवळ ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ५४४ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी आहेत. पावसाळा सुरू झाल्याने, उर्वरित पाणीटंचाई निवारणाची कामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कृती आराखड्यात प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाची जिल्ह्यातील कामे निम्म्यावरच थांबल्याचे चित्र आहे.५८७ कामांना प्रशासकीय मान्यता!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांमार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी ५८७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मान्यता देण्यात आलेल्या कामांपैकी ५४० उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ४७ उपाययोजनांची कामे अद्याप बाकी आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय