शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अकोला जिल्हा : नापिकी, कर्जाला कंटाळून उगवा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 18:39 IST

आगर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून उगवा येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीस आली. सदानंद ऊर्फ बाळू अमृता सिरसाट असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देसदानंद ऊर्फ बाळू अमृता सिरसाट असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.कपाशीवर बोंडअळी आल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत होते.३० डिसेंबर रोजी सकाळी काही मजुरांना गावाच्या पूर्वेस असलेल्या एका शेतात ते मृतावस्थेत आढळले.

आगर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून उगवा येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीस आली. सदानंद ऊर्फ बाळू अमृता सिरसाट असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.सदानंद सिरसाट यांच्याकडे कोरडवाहूची पाच एकर शेती आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून या शेतीतून अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज काढले होते. हे कर्ज २०१५ पासून थकीत होते. तसेच काही कामांसाठी त्यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवलेले आहेत. यावर्षी चांगले उत्पादन होईल, अशी त्यांना अपेक्षा होती; मात्र यावर्षीही चांगले उत्पादन झाले नाही. कपाशीवर बोंडअळी आल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत होते. या विवंचनेतच ते २९ डिसेंबर रोजी घरातून बाहेर गेले होते. रात्री परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; मात्र ते सापडले नाही. ३० डिसेंबर रोजी सकाळी काही मजुरांना गावाच्या पूर्वेस असलेल्या एका शेतात ते मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय राऊत व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. सिरसाट यांच्या मागे पत्नी व तीन मुले आहेत. (वार्ताहर)

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणfarmer suicideशेतकरी आत्महत्या