शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

अकोला जिल्ह्यात सिकलसेलचे १८५ पीडित, तर ३४४५ वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:33 IST

तब्बल ६ लाख ८४ हजार ८८३ नागरिकांची सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. यामध्ये १८५ पीडित, तर ३,४४५ वाहक असल्याचे निष्पन्न झाले.

अकोला: जनुकीय दोषांमुळे रक्ताच्या पेशींमधील हिमोग्लोबिनचा दोष निर्माण होऊन झालेली समस्या म्हणजेच सिकलसेल हा आजार आहे. अनुवांशिक असल्याने आपल्या सतर्कतेतूनच या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे लग्नापूर्वी प्रत्येकाने सिकलसेलची तपासणी करावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो आहे.सिकलसेल हा अनुवांशिक असून, केवळ रुग्णाला पाहून किंवा नाडीची चाचणी करून त्याचे निदान करता येत नाही. रुग्णाच्या रक्ताची प्राथमिक सोल्युबिलिटी तपासणी केल्यावरच या आजाराचे निदान करणे शक्य आहे. या आजारात पीडित आणि वाहक असे दोन प्रकारचे रुग्ण आढळून येतात. जिल्ह्यात २०११ पासून ते आतापर्यंत तब्बल ६ लाख ८४ हजार ८८३ नागरिकांची सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. यामध्ये १८५ पीडित, तर ३,४४५ वाहक असल्याचे निष्पन्न झाले. वाहक असलेल्या रुग्णामध्ये लक्षण दिसत नाही, त्यामुळे हा समाजामध्ये सिकलसेल आजार वाढविण्याचे काम करतो; परंतु पीडित व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे सिकलसेल असलेल्या व्यक्तीने सिकलसेल वाहक किंवा पीडित व्यक्तीसोबत विवाह करणे धोक्याचे ठरू शकते. असे झाल्यास हा आजार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे विशेषत: तरुणाईने वेळीच सतर्कता बाळगत सिकलसेलची तपासणी करून घ्यावी. तपासणी अहवालात वाहक किंवा पीडित असाल तर एकमेकांसोबत विवाह टाळा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.असा विवाह टाळासिकलसेल असलेल्या महिला व पुरुषांनी एकमेकांसोबत विवाह करणे टाळणे हाच त्यावरील नियंत्रणाचा योग्य उपाय आहे. म्हणून सिकलसेल वाहक आणि पीडित किंवा वाहक आणि वाहक, तसेच पीडित आणि पीडित यांनी एकमेकांसोबत विवाह करणे टाळावे.ही आहेत लक्षणे

  • रक्तवाहिन्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव
  • हातपाय दुखणे
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
  • रुग्णांना दम लागणे
  • कावीळ होणे
  • रक्ताचा दोष निर्माण होणे
  • आॅक्सिजनच्या अभावामुळे तीव्र वेदना

कोणाला होतो हा आजारएका पिढीपासून दुसºया पिढीला हाणारा हा आजार प्रामुख्याने भिल्ल आदिवासी किंवा वंचित घटकांमध्ये सर्वसाधारणपणे आढळतो. नात्यात विवाह झाल्यास आजाराचा धोका संभवतो. राज्यात सातपुड्याचा पट्टा, गडचिरोली, विदर्भ या भागात आजाराचे प्रमाण जास्त आहे.सिकलसेल हा आजार अनुवांशिक असल्याने सतर्कता हाच त्यावरील योग्य उपचार आहे. प्रत्येकाने विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करूनच विवाह करावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य