शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अकोला जिल्ह्यात सिकलसेलचे १८५ पीडित, तर ३४४५ वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:33 IST

तब्बल ६ लाख ८४ हजार ८८३ नागरिकांची सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. यामध्ये १८५ पीडित, तर ३,४४५ वाहक असल्याचे निष्पन्न झाले.

अकोला: जनुकीय दोषांमुळे रक्ताच्या पेशींमधील हिमोग्लोबिनचा दोष निर्माण होऊन झालेली समस्या म्हणजेच सिकलसेल हा आजार आहे. अनुवांशिक असल्याने आपल्या सतर्कतेतूनच या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे लग्नापूर्वी प्रत्येकाने सिकलसेलची तपासणी करावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो आहे.सिकलसेल हा अनुवांशिक असून, केवळ रुग्णाला पाहून किंवा नाडीची चाचणी करून त्याचे निदान करता येत नाही. रुग्णाच्या रक्ताची प्राथमिक सोल्युबिलिटी तपासणी केल्यावरच या आजाराचे निदान करणे शक्य आहे. या आजारात पीडित आणि वाहक असे दोन प्रकारचे रुग्ण आढळून येतात. जिल्ह्यात २०११ पासून ते आतापर्यंत तब्बल ६ लाख ८४ हजार ८८३ नागरिकांची सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. यामध्ये १८५ पीडित, तर ३,४४५ वाहक असल्याचे निष्पन्न झाले. वाहक असलेल्या रुग्णामध्ये लक्षण दिसत नाही, त्यामुळे हा समाजामध्ये सिकलसेल आजार वाढविण्याचे काम करतो; परंतु पीडित व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे सिकलसेल असलेल्या व्यक्तीने सिकलसेल वाहक किंवा पीडित व्यक्तीसोबत विवाह करणे धोक्याचे ठरू शकते. असे झाल्यास हा आजार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे विशेषत: तरुणाईने वेळीच सतर्कता बाळगत सिकलसेलची तपासणी करून घ्यावी. तपासणी अहवालात वाहक किंवा पीडित असाल तर एकमेकांसोबत विवाह टाळा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.असा विवाह टाळासिकलसेल असलेल्या महिला व पुरुषांनी एकमेकांसोबत विवाह करणे टाळणे हाच त्यावरील नियंत्रणाचा योग्य उपाय आहे. म्हणून सिकलसेल वाहक आणि पीडित किंवा वाहक आणि वाहक, तसेच पीडित आणि पीडित यांनी एकमेकांसोबत विवाह करणे टाळावे.ही आहेत लक्षणे

  • रक्तवाहिन्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव
  • हातपाय दुखणे
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
  • रुग्णांना दम लागणे
  • कावीळ होणे
  • रक्ताचा दोष निर्माण होणे
  • आॅक्सिजनच्या अभावामुळे तीव्र वेदना

कोणाला होतो हा आजारएका पिढीपासून दुसºया पिढीला हाणारा हा आजार प्रामुख्याने भिल्ल आदिवासी किंवा वंचित घटकांमध्ये सर्वसाधारणपणे आढळतो. नात्यात विवाह झाल्यास आजाराचा धोका संभवतो. राज्यात सातपुड्याचा पट्टा, गडचिरोली, विदर्भ या भागात आजाराचे प्रमाण जास्त आहे.सिकलसेल हा आजार अनुवांशिक असल्याने सतर्कता हाच त्यावरील योग्य उपचार आहे. प्रत्येकाने विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करूनच विवाह करावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य