शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अकोला : कट्यार येथे दोन गटांत हाणामारी; आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:25 IST

बोरगाव मंजू : ग्रामपंचायत उपसरपंचांच्या निवडणुकीवरून कट्यार येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे१७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : ग्रामपंचायत उपसरपंचांच्या निवडणुकीवरून कट्यार येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कट्यार येथे ग्रामपंचायत सरपंच पदभार व उपसरपंच निवड होती. दरम्यान, या निवडणुकीतून वाद होऊन दोन गटांत हाणामारी झाली. श्रीकिसन बावस्कर रा. कट्यार यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावातील सरपंच पदग्रहण व उपसरपंच निवडणूक झाल्यानंतर सरपंच देवीदास भारसाकडे हे बाहेर येताच जय ठाकरे याने त्यांना म्हटले की, तू या गावातून निवडून आला तुला लोकांनी कसा पाठिंबा दिला तेच पाहतो, असे बोलून काठी विटांनी जय ठाकरे, संदीप ठाकरे, राजू सोळंके, गजानन सोळंके, मंगेश डाबेराव, राजू डाबेराव, रवी ठाकरे, उमेश डाबेराव, सुभाष कडू, रामसिंग सोळंके, उत्तम सोळंके, आकाश सोळंके, आनंद डाबेराव, गजानन साबे, ज्ञानेश्‍वर साबे, झाबुराव देशमुख, प्रवीण ढोरे, यांनी संगनमत करून मारहाण केली. बावस्कर यांच्या फिर्यादीवरून १७ जणांविरुद्ध  गुन्हे दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

येवता येथे पोलिसांना मारहाणविझोरा : येथून जवळच असलेल्या येवता येथे उपसरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर विजयी रॅली काढणार्‍यांना मनाई करणार्‍या दोन पोलीस कर्मचार्‍यांना काही युवकांनी मारहाण केल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकारानंतर गावात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांना मारहाण करणार्‍यांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. येवता येथे २९ डिसेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक आणि सरपंचांचा पदभार समारंभ आयोजित करण्यात आला होता. उपसरपंचपदी शिवसेनेच्या वंदना सिरसाट यांची निवड झाली. सरपंच रेणुका कुलट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावातून विजयी रॅली काढली. या रॅलीनंतर उपसरपंचपदी विजयी झालेल्या सिरसाट यांच्या सर्मथकांनीही सायंकाळी गावातून विजयी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, परवानगी नसल्याने रॅली काढण्यास दोन पोलीस कर्मचार्‍यांनी विरोध केला. त्यावरून ग्रामस्थ व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यातूनच काही युवकांनी या पोलिसांना मारहाण केली. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना मारहाण करणार्‍या युवकांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हाgram panchayatग्राम पंचायत