शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अकोला शहरात पाणी पुरवठय़ाच्या कामाची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:42 IST

अकोला : मोठा गाजावाजा करीत शहरात ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणी पुरवठय़ाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अवघा महिना होत नाही, तोच कंत्राटदाराने त्याच्या मनमानी कारभाराची चुणूक दाखविण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराचा निकष, नियमांना ठेंगा‘अमृत’ योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोठा गाजावाजा करीत शहरात ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणी पुरवठय़ाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अवघा महिना होत नाही, तोच कंत्राटदाराने त्याच्या मनमानी कारभाराची चुणूक दाखविण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे. चार इंच जलवाहिनीसाठी किमान साडेतीन फूट खोल खोदकाम करणे अपेक्षित असताना चक्क दीड ते पावणेदोन फूट खोलीवर जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा प्रयत्न प्रभाग १५ मधील भाजपाच्या नगरसेविका शारदा खेडकर यांनी उधळून लावला आहे.केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहराची पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी ११0 कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावापैकी ८७ कोटींच्या निविदेला शासनाने मंजुरी दिली. मनपा प्रशासनाने ‘एपी अँण्ड जीपी’ असोसिएट्स कंपनीची सहा टक्के जादा दराने सादर केलेली निविदा स्वीकारून कंपनीला कार्यादेश दिले. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनीने जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. शहरात जलवाहिनीचे जाळे टाकणे व आठ ठिकाणी जलकुंभांची उभारणी करण्यासाठी कंपनीला दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. अर्थात, सर्व कामकाज निकष व नियमानुसार करण्याची गरज असताना कंत्राटाराने त्याच्या मनमानी कारभाराला सुरुवात केल्याचा प्रकार प्रभाग १५ मधील आदर्श कॉलनी परिसरात समोर आला आहे. आदर्श कॉलनीमध्ये चार इंच जलवाहिनी टाकण्यासाठी कि मान साडेतीन फूट खोदकाम करण्याची गरज असताना कंत्राटदाराकडून चक्क दीड ते पावणेदोन फूट खोलीवर जलवाहिनी टाकली जात असल्याचे भाजप नगरसेविका शारदा खेडकर यांच्या निदर्शनास आले. त्यासंदर्भात त्यांनी तडकाफडकी काम थांबवत जलप्रदाय विभागाला सूचित केले. 

मजीप्राला जबाबदारीचा विसर?‘अमृत’ योजनेंतर्गत पाणी पुरवठय़ाच्या कामाचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे आणि त्यावर तांत्रिक सल्लागार म्हणून शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली. शहराचे भविष्य व योजनेचे महत्त्व लक्षात घेता मजीप्राने डोळ्यात तेल घालून पाणी पुरवठय़ाच्या कामावर देखरेख ठेवणे अपेक्षित असताना आदर्श कॉलनीमधील कामावर मजीप्रासह महापालिकेचा अभियंता उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. 

अभी दिल्ली बहुत दूर है!‘अमृत’ योजनेंतर्गत महान धरण ते अकोला शहरापर्यंतची १६१ कि.मी.ची मुख्य जलवाहिनी बदलण्यासह शहरात जुन्या जलवाहिनीच्या बदल्यात २६५ कि.मी.ची नवीन जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात आठ जलकुं भांची उभारणी केली जाईल. योजनेचा आवाका व कंत्राटदाराचा ढिसाळ कारभार पाहता ‘अभी दिल्ली बहुत दूर है’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाWaterपाणी