शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पाण्याअभावी अकोल्यातील उद्योगांना घरघर; कुंभारी तलावात फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:29 IST

अकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा तलावात आहे.  भीषण पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्र्यांसोबत यावर चर्चा होणार आहे.

ठळक मुद्देलवकरच उद्योगमंत्र्यांसोबत बैठक

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा कुंभारी तलावात आहे.  भीषण पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्र्यांसोबत यावर चर्चा होणार आहे. नागपूरनंतर विदर्भात अकोला एमआयडीसीचे उद्योग राज्य शासनाला मोठा महसूल देतात. अकोल्यातील डाळ, तेल, बेसन आणि गोल्डफिंगर आदी व्यवसायाने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, या उद्योगांना पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना   नसल्याने दर दोन वर्षांनंतर येथे पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो. यंदाही पाणी समस्येमुळे  हे उद्योग अडचणीत सापडले असून, उद्योगांची तहान भागविण्यास एमआयडीसी प्रशासन हतबल झाले आहे. अलिकडेच ‘फूड एक्स्पो’ कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री येथे आले तेव्हा उद्योजकांसोबत त्यांची बैठक झाली होती.त्या बैठकीत उद्योगमंत्र्यांनी या समस्येत जातीने लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याअनुषंगाने पुढील आठवड्यात आ. गोपीकिसन बाजोरीया तसेच संबंधीत अधिकार्‍यांची उद्योगमंत्र्यांसोबत बैठक होत असल्याची माहीती सुत्रांनी   दिली. 

एमआयडीसीची पाणी समस्या गंभीर होत असून, एमआयडीसी प्रशासनाने अजूनही याची दखल गंभीरतेने घेतलेली नाही. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनने सुचविलेल्या बाबींकडे एमआयडीसी प्रशासनाने वेळोवेळी लक्ष दिले असते, तर ही वेळ आली नसती. अजूनही तातडीची उपाययोजना हवी आहे.- कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन.

एमआयडीसीतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात तातडीच्या उपाययोजनांवर निर्णय होईल.  कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी  ६४ खेडी खांबोरा प्रकल्पाच्या पाइपलाइनचा व्यास वाढवून त्यातून एमआयडीसीला पाणी  पुरवठा शक्य आहे. यामध्ये शासनाचे केवळ ६-७ कोटी जातील. या तुलनेत महान, घुंगशीतून पाणी मिळविणे ४0 कोटींच्या घरात जाईल.- आमदार गोपीकिसन बाजोरिया, अकोला.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळWaterपाणी