शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाण्याअभावी अकोल्यातील उद्योगांना घरघर; कुंभारी तलावात फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:29 IST

अकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा तलावात आहे.  भीषण पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्र्यांसोबत यावर चर्चा होणार आहे.

ठळक मुद्देलवकरच उद्योगमंत्र्यांसोबत बैठक

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा कुंभारी तलावात आहे.  भीषण पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्र्यांसोबत यावर चर्चा होणार आहे. नागपूरनंतर विदर्भात अकोला एमआयडीसीचे उद्योग राज्य शासनाला मोठा महसूल देतात. अकोल्यातील डाळ, तेल, बेसन आणि गोल्डफिंगर आदी व्यवसायाने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, या उद्योगांना पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना   नसल्याने दर दोन वर्षांनंतर येथे पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो. यंदाही पाणी समस्येमुळे  हे उद्योग अडचणीत सापडले असून, उद्योगांची तहान भागविण्यास एमआयडीसी प्रशासन हतबल झाले आहे. अलिकडेच ‘फूड एक्स्पो’ कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री येथे आले तेव्हा उद्योजकांसोबत त्यांची बैठक झाली होती.त्या बैठकीत उद्योगमंत्र्यांनी या समस्येत जातीने लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याअनुषंगाने पुढील आठवड्यात आ. गोपीकिसन बाजोरीया तसेच संबंधीत अधिकार्‍यांची उद्योगमंत्र्यांसोबत बैठक होत असल्याची माहीती सुत्रांनी   दिली. 

एमआयडीसीची पाणी समस्या गंभीर होत असून, एमआयडीसी प्रशासनाने अजूनही याची दखल गंभीरतेने घेतलेली नाही. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनने सुचविलेल्या बाबींकडे एमआयडीसी प्रशासनाने वेळोवेळी लक्ष दिले असते, तर ही वेळ आली नसती. अजूनही तातडीची उपाययोजना हवी आहे.- कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन.

एमआयडीसीतील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पुढच्या आठवड्यात मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यात तातडीच्या उपाययोजनांवर निर्णय होईल.  कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी  ६४ खेडी खांबोरा प्रकल्पाच्या पाइपलाइनचा व्यास वाढवून त्यातून एमआयडीसीला पाणी  पुरवठा शक्य आहे. यामध्ये शासनाचे केवळ ६-७ कोटी जातील. या तुलनेत महान, घुंगशीतून पाणी मिळविणे ४0 कोटींच्या घरात जाईल.- आमदार गोपीकिसन बाजोरिया, अकोला.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळWaterपाणी