शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

अकोला : जळालेल्या ‘त्या’ महिलेचा खूनच; मृतक महिला यवतमाळची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:20 IST

अकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, ही महिला यवतमाळ येथील असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देअज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, ही महिला यवतमाळ येथील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी यवतमाळ आणि अकोल्यातील अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यवतमाळ येथील वैभव नगर राजगुरू अपार्टमेंटमधील रहिवासी   सुमन रामभाऊ लक्षणे (वय ६0) अशी या महिलेची ओळख असून, ही महिला १७ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या महिलेची हत्या करून अज्ञात आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा देह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.महिलेच्या जळालेला मृतदेहाच्या प्रकरणात रामदास पेठ पोलीस सर्वच दिशांनी तपास करीत असतानाच यवतमाळ येथील  वाघापूर वैभव नगर राजगुरू अपार्टमेंटमधील रघुनाथ रामभाऊ लक्षणे यांनी आई बेपत्ता असल्याची तक्रार यवतमाळ येथे दाखल केली आहे.  या  तक्रारीमुळे  अकोल्यात आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाला तोंड फुटले आहे. 

 रघुनाथ लक्षणे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ते आपली  पत्नी तसेच मुलासोबत वेगळे राहत होते. त्यांची आई  सुमन रामभाऊ लक्षणे, भाची  पायल मनोज तोंडसे व पत्नीच्या बहिणीची मुलगी प्रियंका पटेल यांच्यासोबत यवतमाळ येथील संकट मोचन रोडवरील नवीन उमरसरा येथे राहतात. १६ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता रघुनाथ आईला भेटून घरी आला होते. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी त्याची भाची पायलने फोन करून  सुमनबाई या १७ डिसेंबरच्या दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या त्या परत आल्या  नाहीत, अशी माहिती दिली. या नंतर सर्वांनी सुमनबाईंचा शोध घेतला. नातेवाईकांकडेही शोध घेतल्यावर तिचा शोध न लागल्याने अखेर  वडगाव पोलीस स्टेशनमध्ये सुमनबाई  बेपत्ता झाल्याची तक्रारी दाखल करण्यात आली. या दरम्यान यवतमाळचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर हे तपास करीत असताना त्यांना अकोला येथे महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी रघुनाथ  यांना फोन करून, या संदर्भात माहिती दिली. सदर मृतदेह हा सुमनबाईंचा तर नाही ना? या संशयावरून त्यांनी अकोला गाठले. पीएसआय  संतोष मनवर व पोलिस कर्मचार्‍यांच्यासोबत रघुनाथ अकोल्यात आले. रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची माहिती घेतली असता सदर महिला सुमनबाई असल्याची ओळख पटली  आहे.  यावरून रघुनाथ यांनी रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादंवी कलम ३0२, २0१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या  प्रकरणात आरोपी हे यवतमाळमधील असल्याची शक्यता असून त्यांना अकोल्यातील कोणाची मदत मिळाली या दृष्टीने तपास केला जात आहे.

सखोल तपासानंतर उलगडणार हत्येचे गूढ या महिलेला कोठे जाळण्यात आले, अकोल्यातील दगडी पुलाखाली कुणी आणले, यामध्ये कोण-कोण सहभागी आहे, हत्येचा उद्देश काय? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनCrimeगुन्हा