शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला : जळालेल्या ‘त्या’ महिलेचा खूनच; मृतक महिला यवतमाळची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:20 IST

अकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, ही महिला यवतमाळ येथील असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देअज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, ही महिला यवतमाळ येथील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी यवतमाळ आणि अकोल्यातील अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यवतमाळ येथील वैभव नगर राजगुरू अपार्टमेंटमधील रहिवासी   सुमन रामभाऊ लक्षणे (वय ६0) अशी या महिलेची ओळख असून, ही महिला १७ डिसेंबरपासून बेपत्ता होती. या महिलेची हत्या करून अज्ञात आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा देह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.महिलेच्या जळालेला मृतदेहाच्या प्रकरणात रामदास पेठ पोलीस सर्वच दिशांनी तपास करीत असतानाच यवतमाळ येथील  वाघापूर वैभव नगर राजगुरू अपार्टमेंटमधील रघुनाथ रामभाऊ लक्षणे यांनी आई बेपत्ता असल्याची तक्रार यवतमाळ येथे दाखल केली आहे.  या  तक्रारीमुळे  अकोल्यात आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाला तोंड फुटले आहे. 

 रघुनाथ लक्षणे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की ते आपली  पत्नी तसेच मुलासोबत वेगळे राहत होते. त्यांची आई  सुमन रामभाऊ लक्षणे, भाची  पायल मनोज तोंडसे व पत्नीच्या बहिणीची मुलगी प्रियंका पटेल यांच्यासोबत यवतमाळ येथील संकट मोचन रोडवरील नवीन उमरसरा येथे राहतात. १६ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता रघुनाथ आईला भेटून घरी आला होते. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी त्याची भाची पायलने फोन करून  सुमनबाई या १७ डिसेंबरच्या दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या त्या परत आल्या  नाहीत, अशी माहिती दिली. या नंतर सर्वांनी सुमनबाईंचा शोध घेतला. नातेवाईकांकडेही शोध घेतल्यावर तिचा शोध न लागल्याने अखेर  वडगाव पोलीस स्टेशनमध्ये सुमनबाई  बेपत्ता झाल्याची तक्रारी दाखल करण्यात आली. या दरम्यान यवतमाळचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर हे तपास करीत असताना त्यांना अकोला येथे महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी रघुनाथ  यांना फोन करून, या संदर्भात माहिती दिली. सदर मृतदेह हा सुमनबाईंचा तर नाही ना? या संशयावरून त्यांनी अकोला गाठले. पीएसआय  संतोष मनवर व पोलिस कर्मचार्‍यांच्यासोबत रघुनाथ अकोल्यात आले. रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची माहिती घेतली असता सदर महिला सुमनबाई असल्याची ओळख पटली  आहे.  यावरून रघुनाथ यांनी रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात भादंवी कलम ३0२, २0१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या  प्रकरणात आरोपी हे यवतमाळमधील असल्याची शक्यता असून त्यांना अकोल्यातील कोणाची मदत मिळाली या दृष्टीने तपास केला जात आहे.

सखोल तपासानंतर उलगडणार हत्येचे गूढ या महिलेला कोठे जाळण्यात आले, अकोल्यातील दगडी पुलाखाली कुणी आणले, यामध्ये कोण-कोण सहभागी आहे, हत्येचा उद्देश काय? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनCrimeगुन्हा