शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोला : महान धरणाने गाठला तळ; धरणात केवळ १६.७९ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:25 IST

अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ  गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा  उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा  योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. तसेच यावर्षी  सिंचनासाठीही पाणी मिळाले नाही. 

ठळक मुद्देअकोला शहरासाठी पाणी आरक्षितमूर्तिजापूर शहर व ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद

लोकमत न्यूज नेवटर्कमहान : अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ  गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा  उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा  योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. तसेच यावर्षी  सिंचनासाठीही पाणी मिळाले नाही. 

या वर्षी महान धरणाच्या परिसरात अल्प पाऊस झाल्याने १ जून ते १५ ऑ क्टोबरदरम्यान धरणाचा जलसाठा केवळ २१.३१ पर्यंत पोहोचला होता. ११  डिसेंबर रोजी धरणात ३४0.४७ मीटर, १५.५0५ द.ल. घ. मीटर १६.७९ टक्के  एवढा जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हाच जलसाठा ३४६.८५  मीटर, ७२.६३२ द.ल.घ. मीटर व ८४.११ एवढा जलसाठा होता. या तुलनेत महान  धरणात यावर्षी एकूण ६७ टक्के जलसाठा कमी आहे. अल्प जलसाठय़ामुळे  धरणातील काही ठिकाणच्या टेकड्या उघड्या पडल्या आहेत. तर धरणाचे पाणी  नदी पात्रात सोडणे बंद केले असल्यामुळे महान काटेपूर्णा नदी पात्र कोरडे पडले  आहे.  

तिसरा व्हॉल्व्ह उघडा पडण्याच्या मार्गावरअकोला शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह  बसवण्यात आले आहेत. यापैकी दोन व्हॉल्व्ह आधीच उघडे पडले असून, तिसरा  व्हॉल्व्हही उघडा पडण्याच्या मार्गावर आहे. या व्हॉल्व्हवर केवळ एक ते दीड  फुटापर्यंत पाणी आहे. पाटबंधारे विभाग बोरगाव मंजूचे सहायक अभियंता अभिजित  नितनवरे यांनी धरणातील पाण्याची परिस्थिती बघता मत्स्य बीज केंद्र  जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाण्याचे व्यवस्थित व काटकसरीने नियोजन  करण्याचे निर्देश दिले.

शेतकर्‍यांचा पाणी उपसा बंदधरणातील पाणी पातळी बघता जलसाठा अकोला शहराला राखीव ठेवण्यात आला  आहे. त्यामुळे धरणातील व नदीमधील पाण्याचा उपसा होऊ नये, याकरिता धरणा तील परवानाधारक शेतकर्‍यांचे तसेच महान धरण ते उन्नई बंधारादरम्यान  परवानाधारक शेतकर्‍यांचे मोटार पंपाचे वीज कनेक्शन ऑगस्ट महिन्यातच का पण्यात आले. त्यामुळे, यावर्षी शेतकर्‍यांना रब्बी व उन्हाळी हंगामापासून वंचित  राहावे लागले आहे. पाण्याचा उपसा कोणी करू नये, याकरिता वेळोवेळी महान  पाटबंधारे विभागाचे कर्मचारी पाहणी करीत आहेत. महान धरणाच्या  जलसाठय़ाकडे सहायक अभियंता अभिजित नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली  शाखा अभियंता सैयद जानोरकार, पाठक, पिंपळकर, शिराळे, हातोलकर, अजीज  खरात, अकबर शहा, झलके हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत. 

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkola cityअकोला शहरMurtijapurमुर्तिजापूरwater transportजलवाहतूक