शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

अकोला : महान धरणाने गाठला तळ; धरणात केवळ १६.७९ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:25 IST

अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ  गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा  उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा  योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. तसेच यावर्षी  सिंचनासाठीही पाणी मिळाले नाही. 

ठळक मुद्देअकोला शहरासाठी पाणी आरक्षितमूर्तिजापूर शहर व ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद

लोकमत न्यूज नेवटर्कमहान : अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ  गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा  उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा  योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. तसेच यावर्षी  सिंचनासाठीही पाणी मिळाले नाही. 

या वर्षी महान धरणाच्या परिसरात अल्प पाऊस झाल्याने १ जून ते १५ ऑ क्टोबरदरम्यान धरणाचा जलसाठा केवळ २१.३१ पर्यंत पोहोचला होता. ११  डिसेंबर रोजी धरणात ३४0.४७ मीटर, १५.५0५ द.ल. घ. मीटर १६.७९ टक्के  एवढा जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हाच जलसाठा ३४६.८५  मीटर, ७२.६३२ द.ल.घ. मीटर व ८४.११ एवढा जलसाठा होता. या तुलनेत महान  धरणात यावर्षी एकूण ६७ टक्के जलसाठा कमी आहे. अल्प जलसाठय़ामुळे  धरणातील काही ठिकाणच्या टेकड्या उघड्या पडल्या आहेत. तर धरणाचे पाणी  नदी पात्रात सोडणे बंद केले असल्यामुळे महान काटेपूर्णा नदी पात्र कोरडे पडले  आहे.  

तिसरा व्हॉल्व्ह उघडा पडण्याच्या मार्गावरअकोला शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह  बसवण्यात आले आहेत. यापैकी दोन व्हॉल्व्ह आधीच उघडे पडले असून, तिसरा  व्हॉल्व्हही उघडा पडण्याच्या मार्गावर आहे. या व्हॉल्व्हवर केवळ एक ते दीड  फुटापर्यंत पाणी आहे. पाटबंधारे विभाग बोरगाव मंजूचे सहायक अभियंता अभिजित  नितनवरे यांनी धरणातील पाण्याची परिस्थिती बघता मत्स्य बीज केंद्र  जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाण्याचे व्यवस्थित व काटकसरीने नियोजन  करण्याचे निर्देश दिले.

शेतकर्‍यांचा पाणी उपसा बंदधरणातील पाणी पातळी बघता जलसाठा अकोला शहराला राखीव ठेवण्यात आला  आहे. त्यामुळे धरणातील व नदीमधील पाण्याचा उपसा होऊ नये, याकरिता धरणा तील परवानाधारक शेतकर्‍यांचे तसेच महान धरण ते उन्नई बंधारादरम्यान  परवानाधारक शेतकर्‍यांचे मोटार पंपाचे वीज कनेक्शन ऑगस्ट महिन्यातच का पण्यात आले. त्यामुळे, यावर्षी शेतकर्‍यांना रब्बी व उन्हाळी हंगामापासून वंचित  राहावे लागले आहे. पाण्याचा उपसा कोणी करू नये, याकरिता वेळोवेळी महान  पाटबंधारे विभागाचे कर्मचारी पाहणी करीत आहेत. महान धरणाच्या  जलसाठय़ाकडे सहायक अभियंता अभिजित नितनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली  शाखा अभियंता सैयद जानोरकार, पाठक, पिंपळकर, शिराळे, हातोलकर, अजीज  खरात, अकबर शहा, झलके हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत. 

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkola cityअकोला शहरMurtijapurमुर्तिजापूरwater transportजलवाहतूक