शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

अकाेला जिल्ह्यातील सुधारित आणेवारी ५० पैशांच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 11:16 IST

Akola Agriculture News यंदा पीक आणेवारी मात्र ५० पैशांच्या वर ६७ पैसे आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : बाेगस बियाणे, ओल्या दुष्काळाचे सावट, परतीच्या पावसाने दिलेला तडाखा, कापसावर आलेली बाेंडअळी अशी संकटांची मालिका कायम असतानाही यंदा पीक आणेवारी मात्र ५० पैशांच्या वर ६७ पैसे आली आहे. त्यामुळे अंतिम आणेवारी ५० पैशांच्या आत आली तरच मदतीची आस आहे, अन्यथा अस्मानी संकटासाेबतच सुलतानी संकटाची टांगती तलवार शेतकऱ्याांवर आहे.

या वर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत मदतीची घोषणा करण्यात आली आहे; मात्र मदतनिधी अद्याप प्राप्त नाही. दुसरीकडे सुधारित आणेवारीही ५० पैशांच्या वर निघाल्याने मदतीबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे.

 

परतीच्या पावसाने लाखाेंचे नुकसान

१ ते २२ ऑक्टोबरदरम्यान परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पंचनामे करण्यात आले नाही.

पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत मिळणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी