शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पैसेवारी ४७ पैसे; अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 10:53 IST

Agriculture News पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्दे ९९० गावांमधील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे आहे. ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली.

अकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे आहे. पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात गत जून ते सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबरअखेरपर्यंत जोरदार पाऊस बरसला. सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. तसेच सोयाबीन, कपाशी, ज्वारी व तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या उत्पादनातही घट झाल्याने, शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जिल्ह्यातील तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दि. ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण १ हजार १२ महसुली गावांपैकी लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे आहे. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती असल्याचे वास्तव समोर आले आहे.

 

शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा !

गत पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. ऑक्टोबर अखेरपर्यंत पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात २६ कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली; मात्र दुसऱ्या टप्प्यातील मदतीची रक्कम अद्याप मिळाली नाही. तसेच ऑक्टोबरमध्ये पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची प्रतीक्षा केली जात आहे.

दुष्काळी सोयी, सवलती लागू होणार?

जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले. त्या आनुषंगाने शासनाकडून जिल्ह्यात दुष्काळी सोयी, सवलती लागू होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील तहसीलदारांकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व लागवडीयोग्य गावांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे आहे.

- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी