शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी हवे २८.१० कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 10:12 IST

Agriculture News २८ कोटी १० लाख ४२ हजार २८२ रुपयांचा मदत निधी अपेक्षित आहे.

अकोला : अतिवृष्टी व पुरामुळे जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात १ हजार १६ गावांतील ४९ हजार ८३५ शेतकऱ्यांच्या ३८ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी २८ कोटी १० लाख ४२ हजार २८२ रुपयांच्या मदत निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांसह शासनाच्या कृषी विभागाकडे पाठविण्यात आला.यावर्षीच्या पावसाळ्यात जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुराने जिल्ह्यात खरीप पिकांसह बागायत पिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी शेतजमीन खरबडून गेली. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार १६ गावांमध्ये ४९ हजार ८३५ शेतकºयांचे ३८ हजार ६४३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांसह शासनाच्या कृषी विभागाकडे सादर करण्यात आला असून, पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसानाची मदत देण्यासाठी २८ कोटी १० लाख ४२ हजार २८२ रुपयांचा मदत निधी अपेक्षित असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पीक नुकसानाचे असे आहे वास्तव!जिल्ह्यातील पीक नुकसानाच्या अहवालानुसार जिल्ह्यात ४७ हजार ५३५ शेतकºयांचे ३८ हजार ३६५ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत पिकांचे, २१ शेतकºयांचे ९ हेक्टर क्षेत्रावरील बागायत पिकांचे, ५ शेतकºयांचे १ हेक्टर ०७ आर क्षेत्रावरील फळपिकांचे आणि जमीन खरबडून गेल्याने २ हजार २७४ शेतकºयांचे २६६ हेक्टर ६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान!पीक नुकसानाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान मूग पिकाचे झाले आहे. जिल्ह्यात ३० हजार ५६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ३ हजार ४४ हेक्टर सोयाबीन, २ हजार ८१३ हेक्टर कपाशी ११३ हेक्टर ज्वारी, ६४० हेक्टर तूर व १ हजार १८८ हेक्टर उडीद पिकाचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी