शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

२८ वर्षानंतरही विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता केवळ एक रुपया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:44 IST

१९९२ मध्ये सुरू केलेला दैनंदिन प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता २८ वर्षानंतरही तेवढाच दिला जात आहे.

अकोला : मागासवर्गातील विद्यार्थिनींची उपस्थिती वाढविण्याला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने १९९२ मध्ये सुरू केलेला दैनंदिन प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता २८ वर्षानंतरही तेवढाच दिला जात आहे. त्यामध्ये वाढ करण्याचा शासनाकडून गेल्या काही वर्षात प्रयत्नच झाला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यातच दर तिमाही भत्ता देताना मुख्याध्यापकांना केवळ ६० ते ७० रुपयांचा धनादेश तयार करून पालकांना देण्याची कटकटही शालेय कामाव्यतिरिक्त असल्याने ती दूर करण्याची मागणी आता शिक्षक संघटनांकडून होत आहे.इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या अनुसूचित जाती, भटक्या जाती, विमुक्त जमातीमधील दारिद्र्यरेषेखालील शालेय विद्यार्थिनींना नियमित शाळेत उपस्थित राहण्यासाठी दैनंदिन १ रुपया भत्ता देण्याचा शासन निर्णय जानेवारी १९९२ मध्ये घेण्यात आला. त्यानंतर अनुसूचित जमातींमधील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींसाठीही हा भत्ता लागू करण्यात आला. त्यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यामध्ये २८ वर्षांनंतरही वाढ झालेली नाही. दैनंदिन उपस्थितीनुसार एक रुपयाप्रमाणे हा भत्ता आजही अनियमितपणे दिला जात आहे. त्यामध्ये वाढ करण्याचा कोणताही प्रयत्न गेल्या २८ वर्षांत झालेला नाही. त्यातच दर तिमाही उपस्थितीनुसार भत्ता देताना तो केवळ ६० ते ७० दिवसाच्या हिशेबानेच द्यावा लागतो. त्यासाठी मुख्याध्यापकांना या रकमेचे धनादेश तयार करून संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना द्यावे लागतात. शैक्षणिक कार्य सोडून ही कामे करावी लागतात. तसेच कमी रकमेचे धनादेश असल्याने त्याचे रोखीकरण करण्याचा प्रयत्नही पालकाकडून केला जात नाही. त्यामुळे ही मदत वाढवण्यात यावी, अन्यथा बंद करावी, या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही त्यामध्ये बदल होत नसल्याचा प्रकार घडत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी