शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

संवादातून सत्तेच्या आशीर्वादासाठी ‘आदित्य’ यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 17:33 IST

ही यात्रा म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला आकार देण्याचा प्रयत्न मानले जाते.

- राजेश शेगोकार  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : काँग्रेसचे युवराज म्हणून विरोधकांनी टिकेचे लक्ष्य केलेल्या राहूल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी काँग्रेसने राज्यभरात त्यांचा युवकांशी संवाद घडवून आणला होता. या युवा संवादातून राहूल गांधी देशाला व त्यांना देश कळला. नेमका असाच पॅर्टन शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात राजकीय बांधणी करण्यासाठी निवडला आहे. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने ते सध्या राज्यभर युवकांशी संवाद साधत आहेत. परवा पश्चीम वºहाडात त्यांची जनाआर्शिवाद यात्रा येऊन गेली. ही यात्रा म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला आकार देण्याचा प्रयत्न मानले जाते. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना सुरू असलेल्या यात्रेतुन राजकीय संचित वाढविण्याचाच शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे या निमित्ताने अधोरेखीत झाले.यात्रेत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, गावात पाणी पोहचले नाही, शिक्षण शुल्क वाढले, कोचींग क्लासचे पीक आले इतकच काय तर महाराष्टÑाची लालपरी संकटात आहे अशा अनेक प्रश्नांवर तरूणाईने आदित्य ठाकरेंना विचारणा केली. त्यांनी सर्वच प्रकाराच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्नही केला, कोणताही प्रश्न टाळला नाही, ही बाब चांगली आहे मात्र या यात्रेमधून समोर आलेल्या समस्यांची दखल कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.शिवसेना सत्तेत असतानाही सकाराच्या विरोधात भूमिका घेते, जे प्रश्न आदित्य यांच्या समोर आले त्याप्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे अधोरेखीत होते मग सरकारचे हिस्सेदार म्हणून जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नांची सोडवणूक आता उरलेल्या पंधरा दिवसात शक्य नाही त्यामुळे पुढेही सत्ता द्या हे प्रश्न ठेवणार नाही असाच जोगावा मागण्याचा प्रयत्न म्हणजे ही यात्रा. आचारसंहिता लागण्यापूर्वी या यात्रेत समोर आलेल्या काही प्रश्नांची तड लागली तर आदित्य यांनी साधलेल्या संवादाला फळ आले असे म्हणता येईल अन्यथा संवादातून सत्तेचा सोपान चढण्यासाठी निघालेल्या यात्रेतील आणखी एक यात्रा एवढीच या यात्रेची नोंद !नेत्यांमध्येच विसंवादआदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यांचे स्वरूप हे संवाद यात्रा असले तरी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये मात्र विसंवाद असल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्टपणे समोर आले. निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेला हा विसंवाद सेनेला चांगलाच त्रास दायक ठरणार असल्याचे संकेत आहेत.अपेक्षांचे ओझेकर्तृत्ववान वडिलधाऱ्यांच्या पाऊलखुणांवर चालतांना त्यांच्या वारसांवर अपेक्षांचे मोठे ओझे असते. या वारसांचे मुल्यमापन करताना सहाजीकच सामान्यांची फुटपटटी पुर्वसुरूींच्या कर्तृत्वाशी तुलना करते. आदित्य ठाकरे यांच्या वाटेलाही असे अपेक्षांचे ओझे आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातु व उद्धव ठाकरे यांचा पुत्र अशी ओळख घेऊन बाहेर पडलेल्या आदित्य यांना स्व:ताची ओळख निर्माण करण्याची संधी या यात्रेने दिली.त्यामुळे वक्तृत्वाचा तो वारसा त्यांच्या जवळ नसला तरी अनुभव मिळवून परिश्रमाने कर्तृत्वाचा आलेख ते उंचावू शकतात त्यासाठी या यात्रेत दिलेली वचने प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना