शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

गुणाकार, भागाकारात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 14:32 IST

जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सलग दुसऱ्यांदा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

अकोला: अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय कठीण, क्लिष्ट वाटतो. त्यामुळे विद्यार्थी बऱ्याचदा गणित विषयापासून दूर पळतात. विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार करताना अडचणी येतात. नव्हे, तर अनेक विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार जमतच नाही. यातून मार्ग काढण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच यंदासुद्धा जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सलग दुसऱ्यांदा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता सातवीत शिकणाºया प्रत्येक तालुक्यातील १0 शाळांमधील १00 याप्रमाणे ७00 विद्यार्थ्यांची गुणाकार व भागाकाराची पूर्व चाचणी व उत्तर चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचणीतून शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम तयार केला होता. प्रायोगिक तत्त्वावर दोन महिने हा कृती कार्यक्रम राबविल्यानंतर पूर्व व उत्तर चाचणीमध्ये गुणाकार व भागाकाराची क्रिया करण्यामध्ये १0 ते १२ टक्के विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून आल्याचे जाणवले. तो सरत्या शैक्षणिक वर्षामध्ये राबविण्यात आला. या कृती कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कितपत बदल घडला, हे दिसून आले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत कृती कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिकणाºया अनेक विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार जमत नाही. गणित विषय बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे जात असल्याने या विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील शाळांची निवड करून विद्यार्थ्यांसाठी दुसºया वर्षीही कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. सध्या माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू आहेत तर काही शाळांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. उन्हाळी सुटी संपल्यानंतर शैक्षणिक सत्राच्या पहिल्या टप्प्यात या शाळांमध्ये कृती कार्यक्रमानुसार विद्यार्थ्यांना गणित विषय समजेल आणि त्यांच्यामधील गुणाकार व भागाकाराची भीती दूर होईल. यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. (प्रतिनधी)गुणाकार व भागाकाराचे संबोध घेतले आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती व गणितपेटी साहित्यावर आधारित शिकविले, सराव दिला तर गणित समजणे सोपे जाते. प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या कृती कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचा पूर्ण कल अद्याप यायचा आहे. तो कळल्यावर येत्या शैक्षणिक वर्षातही गुणाकार व भागाकारासाठी कृती कार्यक्रम राबवू.-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य.जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी