शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 10:46 IST

वरिष्ठ स्तरावरूनच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोरोना संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी २२ मार्चपासून ‘लॉकडाउन’ केल्यानंतर प्रत्येक जण घरात असताना या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कायम राहावे, यासाठी वरिष्ठ स्तरावरूनच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.रस्त्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनोबल वाढविण्यासाठी रोजच मार्गदर्शन करण्यात येते तर नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये म्हणून त्यांनाही पोलिसांकडून भावनिक आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाचे गंभीर आणि मोठे संकट आल्यानंतरही काही नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अशा रिकामटेकड्यांवर कारवाई करण्यासाठी तसेच त्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर उभा आहे. याच कारणामुळे त्यांचा शेकडो नागरिकांशी रोज प्रत्यक्ष संपर्क येत आहे. अशातच मुंबई तसेच पुणे शहरातील काही पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पोलिसांचे मनोबल कमी होण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेल्या पोलीस बांधवांनी या गंभीर संकटाच्या काळातही त्यांचे मनोबल तीळभरही कमी न होऊ देता रस्त्यावर धीरगंभीर उभा आहे. पोलीस अधिकारीही त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम करीत आहेत. काही सामाजिक संघटनांनीही पोलिसांना सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून दिले आहेत. पोलीस प्रशासनही त्यांना या सुविधा पुरवित असून, याामुळे पोलीस आजही प्रत्य्ोकाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा आहे.

पोलीस ठाण्यात ‘सॅनिटायझर रूम’पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाºयांसाठी तसेच प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर रूम तयार करण्यात आलेल्या आहेत. यामधून ये-जा केल्यानंतरच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाज सुरू करण्यात येत आहे.

‘सॅनिटायझर व्हॅन’ दिवस-रात्र रस्त्यावरशहरातील रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त देत असलेल्या पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाची एक मोठी व्हॅन असून, यामध्ये सॅनिटायझर तसेच पोलिसांना आवश्यक असलेल्या काही बाबी ठेवण्यात आलेल्या आहेत.

अधिकाºयांचे मार्गदर्शनपोलीस अधिकारी व कर्मचारी रोज शेकडो नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यानंतर घरी जाऊन त्यांचा कुटुंबीयांसोबत संपर्क येतो; मात्र त्यांना कोरोना यापासून रोखण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, ‘सोशल डिस्टन्सिंग’ही पाळण्यात येते; राष्ट्रगीत घेण्यासाठी गोळा झालेल्या पोलिसांना त्याचवेळी मार्गदर्शन करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी करतात.पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसाठी खबरदारी म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत; मात्र त्यानंतरही पोलिसांना अनेक अडचणींचा सामना काही टवाळखोर नागरिकांमुळे करावा लागत आहे. कुणीही विनाकारण बाहेर पडू नका, अन्यथा आता पोलिसांना त्यांची कारवाई सुरू करावी लागेल.- सचिन कदम, शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस