शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी तयार होणार कृती आराखडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 14:28 IST

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत.

- संतोष येलकरअकोला : संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांसाठी पाणीटंचाई निवारणाकरिता उपाययोजनांचा आराखडा तयार करून, शासनाकडे सादर करण्याचे निर्देश २८ सप्टेंबर रोजी शासनामार्फत काढण्यात आलेल्या परिपत्रकात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाºयांना देण्यात आले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत.राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला, तरी काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागात येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने राज्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांसासाठी २०१८-१९ या वर्षाकरिता संभाव्य पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करून, शासनाकडे सादर करण्याचे निर्देश शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २८ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांना देण्यात आले. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या विविध उपाययोजनांचे कृती आराखडे जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहेत.टंचाईत लाभ होणाºया उपाययोजना प्रस्तावित करा!पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करताना पाणीटंचाईच्या कालावधीतच लाभ होऊ शकेल, अशा कमी खर्चाच्या उपाययोजना पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात येतील, यासंदर्भात जाणीवपूर्वक दक्षता घेण्याच्या सूचनाही शासनाच्या परिपत्रकात देण्यात आल्या.तातडीच्या उपाययोजनांसाठी खर्च, वेळेचा विचार करावा!संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना ठरविताना त्यासाठी होणारा खर्च, भविष्यात होणारा फायदा तसेच उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी लागणारा वेळ या बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात यावा, अशा सूचना शासन परिपत्रकात देण्यात आल्या.कार्यक्षम स्थितीतील टँकर्स उपलब्ध करा!पाणीटंचाईग्रस्त गावांना शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी मागणी करतील, त्यावेळी पूर्णपणे कायक्षम स्थितीतील टँकर्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासन परिपत्रकानुसार संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांना देण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी