शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

संचारबंदीच्या एका महिन्यात १५ हजार वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 11:02 IST

Akola Traffic Police : संचारबंदीच्या कालावधीत तब्बल १४ हजार ७५३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून प्रचंड वाढत असतानाच यावर काही उपाय नसल्याने राज्य शासनाने १५ एप्रिल ते १५ मे या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत तब्बल १४ हजार ७५३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर विनाकारण फिरणाऱ्या ६०० दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतर लगेच १५ एप्रिलपासून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत व शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या दुचाकींवर कारवाई सुरू केली. यासाठी वाहतूक शाखेचे गजानन शेळके यांनी दुचाकीवर दंडात्मक कारवाई सुरू केली. १५ एप्रिल ते १५ मे या एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १४,७५३ हजार दुचाकींवर दंडात्मक कारवाई करून ८ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५८६ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घराबाहेर पडणारे मेडिकल, किराणा, तसेच विविध कारणे सांगत असल्याचे यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र, पोलिसांनी त्याची उलट तपासणी केली असता अनेकजण खोटे बोलत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी अशा दुचाकींवर कारवाई केली.

१४,७५३ दुचाकींवर कारवाई

५८६ दुचाकी जप्त

आठ लाखांचा दंड वसूल

 

कारणे खोटी; ६०० जणांवर गुन्हा

घराबाहेर पडणारे दुचाकीचालक मेडिकल, औषधी, दूध, तसेच किराणा आणत असल्याची कारणे सांगत आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्यासोबत जाऊन पडताळणी केली असता यामधील बहुतांश दुचाकीचालक यांची कारणे खोटी असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अशा ६०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस