शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन! - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:00 IST

अकोला : पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ रुपये मदतीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत मान्य करण्यात याव्या अन्यथा राज्यातील ...

ठळक मुद्देपीक नुकसान भरपाइ हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या!केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार

अकोला: पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ रुपये मदतीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत मान्य करण्यात याव्या अन्यथा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असून, त्यामध्ये वेळप्रसंगी मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी येथे दिला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टी व पुरामुळे विदर्भात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाइपोटी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी १० हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे ही मदत आम्हाला मान्य नसून, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारकडून पैसा नसल्याचे सांगितले जाते; मात्र मंत्र्यांचे दौरे बंद झाले काय, असा सवाल करीत केंद्र आणि राज्यातील दोन्ही सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप तुपकर यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारने मनाचा मोठेपणा दाखवून राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी, सीसीआय व मार्केटिंग फेडरेशनची खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावी, शेतकऱ्यांना पीक विम्याचा शंभर टक्के लाभ मिळावा, सोयाबीन खरेदीचे प्रती क्विंटल ६ हजार रुपये भाव स्थिर करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, कर्जमाफीच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने देण्यात यावा, वीज देयक माफ करण्यात यावे आदी शेतकऱ्यांच्या मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत सरकारने मान्य कराव्या अन्यथा स्वभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात केंद्रातील मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये वेळप्रसंगी मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. केंद्रीय मंत्र्यांसोबतच पीक नुकसानाचा चुकीचा अहवाल शासनाकडे पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांचेही कपडो फाडो आंदोलन करण्यात येणार आहे, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दामुअण्णा इंगोले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात नेत्यांनी पाहणी करून केले ‘फोटेसेशन’!

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पीक नुकसानाची नेत्यांनी पाहणी करून ‘फोटोसेशन’ केले; परंतु या नेत्यांनी विदर्भातील पीक नुकसानाची पाहणी केली नाही. त्यामुळे विदभात शेतकरी नाहीत काय, असा सवाल तुपकर यांनी केला. अकोला जिल्हयात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, जिल्हा प्रशासनाने शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविणे ही खेदजनक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

कृषी कायदे शेतकऱ्यांना आत्महत्यांच्या दारात उभे करणारे!

केंद्रातील मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना आत्महत्यांच्या दारात उभे करणारे असल्याचा आरोप करीत, हमीभावापासून सरकारला दूर जायचे असून, त्यासाठी कृषी कायदे पारित करण्यात आले; परंतु शेतमालाला हमी भाव मिळाला नाही तर शेतकरी उदध्वस्त होइल, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाAkolaअकोला