शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन! - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:00 IST

अकोला : पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ रुपये मदतीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत मान्य करण्यात याव्या अन्यथा राज्यातील ...

ठळक मुद्देपीक नुकसान भरपाइ हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या!केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार

अकोला: पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ रुपये मदतीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत मान्य करण्यात याव्या अन्यथा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असून, त्यामध्ये वेळप्रसंगी मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी येथे दिला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टी व पुरामुळे विदर्भात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाइपोटी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी १० हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे ही मदत आम्हाला मान्य नसून, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारकडून पैसा नसल्याचे सांगितले जाते; मात्र मंत्र्यांचे दौरे बंद झाले काय, असा सवाल करीत केंद्र आणि राज्यातील दोन्ही सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप तुपकर यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारने मनाचा मोठेपणा दाखवून राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी, सीसीआय व मार्केटिंग फेडरेशनची खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावी, शेतकऱ्यांना पीक विम्याचा शंभर टक्के लाभ मिळावा, सोयाबीन खरेदीचे प्रती क्विंटल ६ हजार रुपये भाव स्थिर करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, कर्जमाफीच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने देण्यात यावा, वीज देयक माफ करण्यात यावे आदी शेतकऱ्यांच्या मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत सरकारने मान्य कराव्या अन्यथा स्वभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात केंद्रातील मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये वेळप्रसंगी मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. केंद्रीय मंत्र्यांसोबतच पीक नुकसानाचा चुकीचा अहवाल शासनाकडे पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांचेही कपडो फाडो आंदोलन करण्यात येणार आहे, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दामुअण्णा इंगोले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात नेत्यांनी पाहणी करून केले ‘फोटेसेशन’!

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पीक नुकसानाची नेत्यांनी पाहणी करून ‘फोटोसेशन’ केले; परंतु या नेत्यांनी विदर्भातील पीक नुकसानाची पाहणी केली नाही. त्यामुळे विदभात शेतकरी नाहीत काय, असा सवाल तुपकर यांनी केला. अकोला जिल्हयात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, जिल्हा प्रशासनाने शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविणे ही खेदजनक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

कृषी कायदे शेतकऱ्यांना आत्महत्यांच्या दारात उभे करणारे!

केंद्रातील मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना आत्महत्यांच्या दारात उभे करणारे असल्याचा आरोप करीत, हमीभावापासून सरकारला दूर जायचे असून, त्यासाठी कृषी कायदे पारित करण्यात आले; परंतु शेतमालाला हमी भाव मिळाला नाही तर शेतकरी उदध्वस्त होइल, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाAkolaअकोला